शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 18, 2023 19:25 IST

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी सुद्धा आपली शेतीची कामे झपाट्याने मार्गी लावताना दिसत होता. पुढील काही दिवस हे मुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस पिछाडीवर आहे.दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात केली. अगदी दिवसभर संततधार स्वरूपाचा पाऊस पडत होता. गेले काही दिवस पाऊस न पडल्याने शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतीची कामे मार्गी लावली आहेत.

जिल्ह्यात इतकी झाली पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३५.५ मिमी च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात ५१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १३२३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड- २०.०२ (१२४२.०२), मालवण- ३३.०२ (१३१७.०९), सावंतवाडी- ३९.१ (१५४९.८), वेंगुर्ला-३६.२ (१३६०.९), कणकवली- ३८ (११७५.७), कुडाळ- ४१.८ (१३४१.९), वैभववाडी- ३७ (१२३९.५), दोडामार्ग- ५१.२ (१४६५.८) असा पाऊस झाला आहे.

अद्यापही ४७५ मिमी सरासरी पाऊस पिछाडीवरगतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. आजच्या दिवसाची पावसाची नोंद घेतली असता चालू वर्षी सरासरी ४७५ मिमी पाऊस कमी झाला आहे. २०२२ मध्ये आजच्या दिवशी १७९८ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात २१५६ मिमी झाला होता. तर सर्वाधिक कमी पाऊस देवगड तालुक्यात १४४७ मिमी इतका झाला होता.

५१ टक्केच धरणे भरलीयंदा झालेल्या कमी पावसाने जिल्ह्यातील धरणे कासवगतीने भरत आहेत. धरणांचा आजचा अहवाल पाहता धरण केवळ ५१.४९ टक्के भरली आहेत. २०२१ मध्ये याच दिवशी ७२ टक्के तर २०२२ मध्ये ७० टक्के धरणे भरली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता.

आतापर्यंत झालेले नुकसान..!आज पडलेल्या पावसामुळे कोठेही नुकसान अहवाल नाही. १७ रोजीच्या नुकसान अहवालानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ८१ अंशतः पक्की घरे कोलसली आहेत. ५ कच्ची घरे कोसळली आहेत. ३ झोपड्या, ८ गोठे कोसळले आहेत. २ जनावरे दगावली आहेत.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात..!गतवर्षी जुलै च्या पहिल्या टप्प्यात शेतीची कामे पूर्ण झाली होती. या वर्षी तशी परिस्थीती नाही आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतीची कामे सुद्धा पुढे गेली आहेत. त्यात मध्ये मध्ये पाऊस दडी मारत असल्याने शेतीला आवश्यक पाणी नसल्याने लावणीची कामे थांबली होती. आज संततधार पावसामुळे शेतीची कामे मार्गी लावण्यात शेतकरी राजा व्यस्थ होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीDamधरण