शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 18, 2023 19:25 IST

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी सुद्धा आपली शेतीची कामे झपाट्याने मार्गी लावताना दिसत होता. पुढील काही दिवस हे मुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस पिछाडीवर आहे.दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात केली. अगदी दिवसभर संततधार स्वरूपाचा पाऊस पडत होता. गेले काही दिवस पाऊस न पडल्याने शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतीची कामे मार्गी लावली आहेत.

जिल्ह्यात इतकी झाली पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३५.५ मिमी च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात ५१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १३२३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड- २०.०२ (१२४२.०२), मालवण- ३३.०२ (१३१७.०९), सावंतवाडी- ३९.१ (१५४९.८), वेंगुर्ला-३६.२ (१३६०.९), कणकवली- ३८ (११७५.७), कुडाळ- ४१.८ (१३४१.९), वैभववाडी- ३७ (१२३९.५), दोडामार्ग- ५१.२ (१४६५.८) असा पाऊस झाला आहे.

अद्यापही ४७५ मिमी सरासरी पाऊस पिछाडीवरगतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. आजच्या दिवसाची पावसाची नोंद घेतली असता चालू वर्षी सरासरी ४७५ मिमी पाऊस कमी झाला आहे. २०२२ मध्ये आजच्या दिवशी १७९८ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात २१५६ मिमी झाला होता. तर सर्वाधिक कमी पाऊस देवगड तालुक्यात १४४७ मिमी इतका झाला होता.

५१ टक्केच धरणे भरलीयंदा झालेल्या कमी पावसाने जिल्ह्यातील धरणे कासवगतीने भरत आहेत. धरणांचा आजचा अहवाल पाहता धरण केवळ ५१.४९ टक्के भरली आहेत. २०२१ मध्ये याच दिवशी ७२ टक्के तर २०२२ मध्ये ७० टक्के धरणे भरली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता.

आतापर्यंत झालेले नुकसान..!आज पडलेल्या पावसामुळे कोठेही नुकसान अहवाल नाही. १७ रोजीच्या नुकसान अहवालानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ८१ अंशतः पक्की घरे कोलसली आहेत. ५ कच्ची घरे कोसळली आहेत. ३ झोपड्या, ८ गोठे कोसळले आहेत. २ जनावरे दगावली आहेत.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात..!गतवर्षी जुलै च्या पहिल्या टप्प्यात शेतीची कामे पूर्ण झाली होती. या वर्षी तशी परिस्थीती नाही आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतीची कामे सुद्धा पुढे गेली आहेत. त्यात मध्ये मध्ये पाऊस दडी मारत असल्याने शेतीला आवश्यक पाणी नसल्याने लावणीची कामे थांबली होती. आज संततधार पावसामुळे शेतीची कामे मार्गी लावण्यात शेतकरी राजा व्यस्थ होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीDamधरण