शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सिंधुदुर्गात यंदा पावसाची पिछाडी, गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस कमीच

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 18, 2023 19:25 IST

मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची काल, सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी मध्यरात्री पासून दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील सर्वच भागात पहाटेपासूनच संततधार पाऊस पडला. काही ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. शेतकरी सुद्धा आपली शेतीची कामे झपाट्याने मार्गी लावताना दिसत होता. पुढील काही दिवस हे मुसळधार पावसाचे असणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही सरासरी ४७५ मिली पाऊस पिछाडीवर आहे.दडी मारलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासूनच बरसायला सुरुवात केली. अगदी दिवसभर संततधार स्वरूपाचा पाऊस पडत होता. गेले काही दिवस पाऊस न पडल्याने शेतकरी राजा चिंतेत होता परंतु आज झालेल्या पावसाने शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी शेतीची कामे मार्गी लावली आहेत.

जिल्ह्यात इतकी झाली पावसाची नोंदजिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३५.५ मिमी च्या सरासरीने पाऊस झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक दोडामार्ग तालुक्यात ५१.२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात एकूण सरासरी १३२३.६ मि.मी. पाऊस झाला आहे. देवगड- २०.०२ (१२४२.०२), मालवण- ३३.०२ (१३१७.०९), सावंतवाडी- ३९.१ (१५४९.८), वेंगुर्ला-३६.२ (१३६०.९), कणकवली- ३८ (११७५.७), कुडाळ- ४१.८ (१३४१.९), वैभववाडी- ३७ (१२३९.५), दोडामार्ग- ५१.२ (१४६५.८) असा पाऊस झाला आहे.

अद्यापही ४७५ मिमी सरासरी पाऊस पिछाडीवरगतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी झाला आहे. आजच्या दिवसाची पावसाची नोंद घेतली असता चालू वर्षी सरासरी ४७५ मिमी पाऊस कमी झाला आहे. २०२२ मध्ये आजच्या दिवशी १७९८ मिमी सरासरी पाऊस झाला होता. सर्वाधिक पाऊस सावंतवाडी तालुक्यात २१५६ मिमी झाला होता. तर सर्वाधिक कमी पाऊस देवगड तालुक्यात १४४७ मिमी इतका झाला होता.

५१ टक्केच धरणे भरलीयंदा झालेल्या कमी पावसाने जिल्ह्यातील धरणे कासवगतीने भरत आहेत. धरणांचा आजचा अहवाल पाहता धरण केवळ ५१.४९ टक्के भरली आहेत. २०२१ मध्ये याच दिवशी ७२ टक्के तर २०२२ मध्ये ७० टक्के धरणे भरली होती. गतवर्षी चांगला पाऊस झाला होता.

आतापर्यंत झालेले नुकसान..!आज पडलेल्या पावसामुळे कोठेही नुकसान अहवाल नाही. १७ रोजीच्या नुकसान अहवालानुसार एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ४ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. ८१ अंशतः पक्की घरे कोलसली आहेत. ५ कच्ची घरे कोसळली आहेत. ३ झोपड्या, ८ गोठे कोसळले आहेत. २ जनावरे दगावली आहेत.

शेतीची कामे अंतिम टप्प्यात..!गतवर्षी जुलै च्या पहिल्या टप्प्यात शेतीची कामे पूर्ण झाली होती. या वर्षी तशी परिस्थीती नाही आहे. पाऊस उशिरा झाल्याने शेतीची कामे सुद्धा पुढे गेली आहेत. त्यात मध्ये मध्ये पाऊस दडी मारत असल्याने शेतीला आवश्यक पाणी नसल्याने लावणीची कामे थांबली होती. आज संततधार पावसामुळे शेतीची कामे मार्गी लावण्यात शेतकरी राजा व्यस्थ होता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीDamधरण