शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

चांदा ते बांदा योजना रद्द होऊ देणार नाही- वैभव नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 19:18 IST

युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती.

कुडाळ- चांदा ते बांदा ही योजना अतिशय लोकांसाठी केलेली योजना आहे. योजना रद्द करण्याचा आदेश काढण्यात आला तरी तो आदेश रद्द करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल अशी प्रतिक्रिया आमदार वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

मागील युती सरकारने चांदा ते बांदा ही योजना सुरू केली होती. या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दीपक केसरकर व राज्याचे गृह राज्य व वित्त मंत्री दीपक केसरकर यांनी ही योजना सुरू करण्यासाठी व अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून ही योजना रद्द करण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच प्रशासना मध्ये केली जात होती.

याबाबत आमदार वैभव नाईक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की सदरची ही योजना अत्यंत महत्त्वाची व लोकांसाठी असलेली योजना आहे. या योजनेचे महत्त्व जनसामान्यात वाढत आहे. त्यामुळे ही योजना रद्द होता कामा नये. याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर व मी असे सर्वजण मिळून या बाबत मुख्यमंत्री व वित्त मंत्री यांची भेट घेऊन ही योजना रद्द होता कामा नये अशी मागणी करणार आहोत. तसेच ही योजना रद्द करण्याचे जर प्रशासन स्तरावरून आदेश निघाले असले तरी हा आदेश रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून तो आदेश लवकरच रद्द होईल असेही आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDipak Kesarkarदीपक केसरकर