शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

कोकणात धुवाँधार पावसाची शक्यता; सिंधुदुर्गात रेड तर रायगड, रत्नागिरीत यलो अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 06:48 IST

११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराला रविवारी सकाळी पावसाने धडकी भरविली असतानाच दुपारी, सायंकाळ मात्र कोरडी गेली, तर दुसरीकडे ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमध्ये पावसाने धुवाँधार बॅटिंग केली असून, या पावसाचा जोर उत्तरोत्तर वाढत असल्याने सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

 मुंबईत सकाळी पावसाने बऱ्यापैकी जोर पकडला होता. सकाळी ९ वाजेपर्यंत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांचा रविवार पाण्यात जाईल, अशी भीती होती. प्रत्यक्षात मात्र सकाळी १० नंतर पावसाने मुंबईकडे पाठ फिरवली. 

 सायंकाळी ६ वाजेपर्यंत हवामान ढगाळ असेल तरी पावसाचा कुठेच पत्ता नव्हता. सिंधुदुर्गातील आवळेगाव येथे रविवारी दुपारी ३:४५ वाजेपर्यंत २३९ मिमी पावसाची नोंद झाली. 

 अत्यंत जोरदार पाऊस म्हणून या पावसाची नोंद झाली असून, नद्या-नाल्यांना पूर येईल. त्यामुळे स्थानिकांनी खबरदारी घ्यावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले. तसेच मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

मोठ्या पावसाच्या नोंदी / मिमीलोणावळा     १२९ पनवेल     १२१ कर्जत     ११५ मुरबाड     ११५माथेरान     २२० मंडणगड (रत्नागिरी)      १०५ संगमेश्वर (रत्नागिरी)     १०२ लांजा (रत्नागिरी)     १०२ राजापूर (रत्नागिरी)     १३५ अंबोली (सिंधुदुर्ग)     २३३ 

टॅग्स :konkanकोकणRainपाऊसRaigadरायगडRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग