शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

अर्जुनेतील बोगस झाडांचे लोण अन्य प्रकल्पांतही

By admin | Updated: September 3, 2015 23:09 IST

भ्रष्टाचार व्यापक : एजंटासह महसूल अधिकाऱ्यांनी केले उखळ पांढरे--अर्जुनेत भ्रष्टाचाराचे धरण भाग -३

विनोद पवार- राजापूर  -अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील भ्रष्टाचाराची सुरुवात साधारण एक दशकापासून झाली आहे. प्रारंभी या प्रकल्पाच्या कालव्यांसाठीच्या भूसंपादनाची नोटीस निघताच एका महाभाग एजंटाने पाचल परिसरातील एका बड्या जमीन दलालाच्या मदतीने बाधित शेतकऱ्यांसाठी यशस्वी सापळा रचला व संपादित जमिनीमध्ये झाडे लावण्याचा सपाटा सुरु केला. त्यावेळी सुरु झालेली ही भ्रष्टाचाराची गटारगंगा आजतागायत वाहात आहे. मात्र, आता या भ्रष्टाचारात सामील होत एका वरिष्ठ महसुली अधिकाऱ्याने कळसच रचण्याचे काम केले आहे. या बोगस झाडांच्या अनुदानाचे लोण आता अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पापुरतेच मर्यादित न राहता त्याचे नाते जामदा प्रकल्पाबरोबरच सिंंधुदुर्गातील काही प्रकल्पांशी जोडले गेल्याचेही पुढे आले आहे.सुरुवातीला त्या एजंटाच्या नादी लागून काही संबंधित शेतकऱ्यांनी भू संपादन झाल्यानंतर आपापल्या जमिनीमध्ये हजारो झाडांची लागवड केली होती. एका महाभागाने तर एक हजार सागवानाची रोपे व तेवढीच केळीची झाडे लावून शासनाकडून रग्गड पैसा वसूल करण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व सुरु असताना महसूल सेवेतीलच एका बड्या महिला अधिकाऱ्याच्या पतीने यामध्ये सहभाग घेतला. त्याच्या साथीने बोकाळलेल्या त्या एजंटाने अर्जुना धरणाच्या कालव्यांच्या संपादित जागेत झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. तेवढ्यावरच समाधान न झाल्याने पूर्व परिसरातील जामदासह अन्य प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात फळझाडांसह जंगली झाडांचीही लागवड केली गेली होती. त्यानंतर हा प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित झाला होता. मात्र, महसुली अधिकाऱ्यांच्या कागदोपत्री बनेल अहवालांमुळे संबंधितांवर कोणतीच कारवाई झाली नव्हती. या संधीचा अचूक फायदा उठवत पुढील काही अधिकाऱ्यांनी आपापल्या तुंबड्या भरण्याचे काम पार पाडले. आता आलेला हा महसुली बडा अधिकारीही तीच री ओढत आहे. नवा महसुली अधिकारी रुजू होताच मधल्या काळात शांत बसलेल्या त्या एजंटाने व त्याच्याच गोतावळ्याने लाडीगोडी लावत नवीन अधिकाऱ्याशी संधान साधले. त्याची मर्जी संपादन झाल्यानंतर आपले पत्ते पुन्हा टाकायला सुरुवात केली. त्या खेळाला महसुली अधिकाऱ्याने हात दिल्याने या भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढली. यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. या प्रकरणाचा बभ्रा होताच नेहमी पाचल बाजारपेठेत दिसणाऱ्या त्या एजंटाने तालुक्यातून पोबारा केला असला तरी पाचल बाजारपेठेत जमीन खरेदी-व्रिकीचे व्यवहार करणारा त्याचा दलाल मात्र कार्यरत आहे.कारवाईच्या भीतीने एजंट गायबया प्रकरणाबाबत तक्रारी होऊ लागल्यानंतर त्या एजंटासह महसूलचा अधिकारी संभाव्य कारवाईच्या भीतीने गायब झाला असल्याची चर्चा मात्र पाचल परिसरात नाक्यानाक्यावर सुरु आहे. अर्जुना प्रकल्प उभारणीच्या पहिल्या दिवसापासूनच एजंटांची टोळी याठिकाणी कार्यरत आहे. या भागात अनेक अशिक्षित लोक राहात असल्याने त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा या टोळीकडून घेतला जात आहे. सध्या असे अनेक प्रकार सुरु आहेत. ग्रामीण भागातील या गोरगरीब जनतेच्या जमिनी बड्या किमतीत विकून कमिशनसह जमिनीच्या रकमेतील काही रक्कमही हडप करण्याचे प्रकार सुरु आहेत.