शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

सुरेश प्रभूं व्यतिरिक्त कोणताही उमेदवार लादल्यास प्रचार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 18:13 IST

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाच्यावतीने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनाच उमेदवारी देण्यात यावी. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात

ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांचा निर्धार : कणकवलीतील पत्रकार परिषदेत केले जाहीर'राऊत नको...प्रभूच हवे...' !

कणकवली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातून भाजपाच्यावतीने  केंद्रीय मंत्री  सुरेश प्रभू यांनाच  उमेदवारी देण्यात यावी.  शिवसेना खासदार  विनायक राऊत यांनी गेल्या पाच वर्षात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे विनायक राऊत यांच्यासह अन्य पक्षाचा कोणताही उमेदवार लादल्यास भाजपा कार्यकर्ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचा प्रचार करणार नाहीत असा निर्धार  कणकवली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी  केला आहे. तसेच वरिष्ठ स्तरावर आपले म्हणणे मांडले  असल्याची माहिती भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे यांनी येथे दिली.

       

कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष संदेश सावंत -पटेल, माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर, भाजपा सरपंच आघाडी जिल्हाध्यक्ष रमेश पावसकर, पशुराम झगडे, तालुका सरचिटणीस बबलू सावंत, पप्पू पूजारे, प्रदीप गावडे ,समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

       यावेळी राजश्री धुमाळे म्हणाल्या,कणकवली रेल्वे स्थानक सुशोभीकरण, बांधकरवाडी अंडरपासचे काम केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे साध्य झाले आहे. मात्र, या कामांचा  शुभारंभ आणि उदघाटन करताना  खासदार विनायक राऊत यांना भाजपाचा विसर पडला. सन 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत  मोदी लाटेत विनायक राऊत खासदार झाले आहेत. त्यांचा प्रचार भाजप कार्यकर्त्यानी केला त्यामुळे निवडणुकीत त्यांना यश मिळाले. मात्र,  निवडणुकीच्या वेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून व विनायक राऊत यांच्याकडून भाजपला दिलेली आश्वासने पाळण्यात आलेली नाहीत. विकास कामांसाठी निधीही दिलेला नाही. त्यामुळे आम्हाला भाजपचा हक्काचा खासदार हवा आहे. सुरेश प्रभूंच्या रूपाने तो आम्हाला मिळू शकतो.

        यावेळी राजन चिके म्हणाले, सुरेश प्रभू लोकसभेत निवडून गेल्यावर ते पुन्हा मंत्री होतील.तर इतर कोणीही व्यक्ती निवडून गेली तर ती फक्त खासदारच रहाणार आहे. त्यामुळे येथील विकास खुंटणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वानुमते सुरेश प्रभू यांनाच खासदारकीची उमेदवारी द्यावी . अशी मागणी केली आहे.पनवेल येथील भाजपा मेळाव्यात आम्ही भाजपाच्या हक्काच्या खासदारासाठी प्रभू यांचेच नाव सुचवले आहे.

           संदेश सावंत - पटेल म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेने भाजपाला नेहमीच फसवले आहे.  त्यामुळे कोअर कमिटीकडे प्रभू यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी आम्ही आग्रह धरला आहे. कोअर कमिटीनेही वरिष्ठांकडे आमची मागणी पोहोचवली आहे.

         परशुराम झगडे म्हणाले,  ज्यांनी विनायक  राऊत यांचा प्रचार केला त्या भाजपा कार्यकर्त्यांशी संपर्क नसल्याने ते ओळखूही शकणार नाहीत .अशी स्थिती आहे. भाजपाशी समन्वय ठेवण्यात राऊत असफल ठरले आहेत.              

          रमेश पावसकर म्हणाले, सिंधुदुर्ग  जिल्ह्यात भाजपाचे ७४ सरपंच, ६० उपसरपंच, ९०० ग्रामपंचायत सदस्य आहेत. मात्र , संबधित सरपंच , उपसरपंच , सदस्य असलेल्या गावात खासदारांकडून निधीच देण्यात न आल्याने विकास कामे करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे आमच्या हक्काच्या खासदारांच्या माध्यमातून गावविकासासाठी निधी मिळण्यासाठी सुरेश प्रभूच उमेदवार असणे गरजेचे आहे. असेही पावसकर यावेळी म्हणाले.

         बबलू सावंत म्हणाले, आमच्या मित्रपक्षातील असलेल्या खासदारांकडून सिवर्ल्ड, नाणार अशा प्रकल्पाना विरोध केला जात आहे. रोजगार निर्माण करणारे प्रकल्प जर जिल्ह्यात आले नाहीत.तर बेरोजगारी आणखीन वाढणार आहे. तरुणांना रोजगार देऊ न शकणारे खासदार काय कामाचे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'राऊत नको...प्रभूच हवे...' !

गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत व शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून  भाजपचे खच्चीकरण करण्यात आले आहे. त्यांनी भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळेच ' राऊत नको...प्रभूच हवे...' अशी आमची मागणी आहे. या मागणीला सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद लाभत आहे. जनतेलाही सुरेश प्रभूच खासदार म्हणून हवे आहेत. असे यावेळी राजश्री धुमाळे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाSuresh Prabhuसुरेश प्रभू