शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

गेली २५ वर्षे सत्तेत असलेले चारही पक्ष ठरले अपयशी :परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 15:49 IST

Parshuram Upkar, hospital, sindhudurgnews सत्ताधारी व विरोधक आरोग्य, रस्ते व अन्य मुद्यांवरून एकमेकांवर आरोप करीत आहेत. भाजपवाले सत्तेत असताना स्वत: काही करू शकले नाहीत. सत्ता गेल्यानंतर आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. गेल्या २५ वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चार पक्षांचे सरकार होते. पाटबंधारे, मच्छिमार, रस्ते, आरोग्य प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.

ठळक मुद्देगेली २५ वर्षे सत्तेत असलेले चारही पक्ष ठरले अपयशी :परशुराम उपरकर जनतेची दिशाभूल; महिला रुग्णालय अद्यापही सुरू नाही

कणकवली : सत्ताधारी व विरोधक आरोग्य, रस्ते व अन्य मुद्यांवरून एकमेकांवर आरोप करीत आहेत. भाजपवाले सत्तेत असताना स्वत: काही करू शकले नाहीत. सत्ता गेल्यानंतर आरोप करून जनतेची दिशाभूल करीत आहेत.गेल्या २५ वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चार पक्षांचे सरकार होते. पाटबंधारे, मच्छिमार, रस्ते, आरोग्य प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरले, असा आरोप मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला.कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ताराम बिडवाडकर यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.उपरकर म्हणाले, शिवसेना आता सत्तेत असताना शिवसेना कार्यकर्ते आंदोलनाची भाषा करताहेत. गेल्या वर्षी शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळावा यासाठी अशोक दळवी रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा करीत आहेत. तर मालवण शहरप्रमुख पॅकेजमधून गस्ती नौका घ्याव्यात असे सांगत आहेत. माजी पालकमंत्र्यांनी गस्तीनौका आल्याची घोषणा करीत सत्कार करून घेतला होता.सत्ताधारी रुग्णालयाच्या बाबतीत राजकारण करताहेत. त्यांना कुडाळचे महिला रुग्णालय सुरू करता येत नाही. मी आमदार असताना छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला १ कोटी देण्याचे तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी आदेश दिले होते. मात्र, ते पैसे अद्यापही खर्च करता आले नाहीत.गुंठ्याला १०० रुपये म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाचसत्तेतील व विरोधी पक्षात बसलेले आरोग्य, रस्ते, पाणी प्रश्न सोडविण्यासाठी असफल ठरले आहेत. सरकारने हेक्टरी १० हजार रुपये जाहीर केले. गुंठ्याला १०० रुपये मिळतील. ही शेतकऱ्यांची चेष्टाच आहे. या विरोधात मनसे आंदोलन करणार आहे. सताधारी शिवसेना सहा वर्षांपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात मोर्चा आंदोलने करीत होती. मात्र, स्वतः ६ वर्षांच्या सत्तेच्या काळात प्रश्न सोडवू शकले नाहीत.

घरबांधणी परवानगी ग्रामपंचायतींना दिल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगत मंत्र्यांचा सत्कार केला. मात्र, अद्याप ग्रामपंचायतींना परवानगीचे अधिकार नाहीत, ही जनतेची फसवणूक आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग