शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तलाठ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, ऐनारीवासीय संतप्त, कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 4:40 PM

पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.

ठळक मुद्देतलाठ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक, ऐनारीवासीय संतप्त पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

वैभववाडी : पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास भुईबावडा तलाठी यु. जी. कदम हे टाळाटाळ करीत आहेत. याशिवाय ते ग्रामस्थांशी उद्धटपणे वागत असून त्यांची तत्काळ बदली करावी, अशी मागणी ऐनारी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, या तलाठ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी केली आहे.ऐनारी हे गाव भुईबावडा सजामध्ये येते. पूरस्थितीमुळे ऐनारी येथील अनेक घरे, गोठे आणि काजू बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी ग्रामस्थ तलाठी कदम यांच्याकडे आग्रह धरीत असतात. परंतु, पंचनामे करणार नाही. काही करायचे ते करा अशा प्रकारची उद्धट उत्तरे ते ग्रामस्थांना देतात. गेली दोन वर्षे कदम या गावात असून ग्रामस्थांशी त्यांचे वर्तन चांगले नाही.त्यामुळे २०१७ मध्ये त्यांची गावातून बदली करावी असा ठराव ऐनारी ग्रामसभेत करण्यात आला होता. आताही आक्रमक भूमिका घेत या तलाठ्याची तत्काळ गावातून उचलबांगडी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे. दरम्यान, यासंदर्भात पालकमंत्री केसरकर आणि जिल्हाधिकारी यांना शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी निवेदन दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, तलाठी कदम यांच्यामुळे ऐनारी गावातील अनेक कामे रखडली आहेत. पूरामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ पंचनामे करून आधार देण्याची गरज असताना कदम हे तेथील लोकांना आणखी त्रास देत आहेत. तरी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.खात्री करून निर्णय घेऊ : तहसीलदारऐनारी ग्रामस्थांनी आपल्याकडे निवेदन दिलेले आहे. ग्रामस्थांच्या निवेदनाची खात्री करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे तहसीलदार रामदास झळके यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग