शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

उच्च दाब वीज वितरण प्रणालीसाठी 5000 कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 1:44 PM

गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे.

कणकवली : गेल्या चार वर्षाच्या काळात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ चांगले काम करीत आहे. या मंडळासमोर अनेक आव्हाने आहेत. तरीही सन 2014 पासून आतापर्यंतच्या  कालावधीत वीज निर्मिती क्षमतेमध्ये 3300 मेगावॅटची वाढ झालेली आहे. तसेच राज्य भारनियमन मुक्त झालेले आहे. सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रोत्साहित केली जात आहे. तसेच उच्च दाब विज वितरण प्रणाली (एचव्हीडीएस )यासाठी 5000 कोटींची गुंतवणूक शासन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली.येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महावितरणचे कोकण विभाग प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतरे , कोकण परिमंडळ मुख्यअभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील  अशोक शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी  विश्वास पाठक म्हणाले, राज्यात 25000 मेगावॅटपर्यंत विजेची मागणी पोहोचली आहे. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे गेल्या तीन वर्षांपासून विविध योजनांच्या माध्यमातून सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडाशिवाय महावितरणने 20630 मेगावॅट विजेचा पुरवठा केला तर महापारेषणने 24012 मेगावॅट वीज पारेषित केली.सन 2014 मध्ये सु्मारे 35 लाख कृषिपंप धारक वीज ग्राहक होते. त्यात आता वाढ झाली आहे. नोव्हेंबर 2014 पासून ऑगस्ट 2018 पर्यंत 4 लाख 34 हजार 304 कृषिपंप वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. कृषिपंपांना यापुढे उच्च दाब विज वितरण प्रणाली द्वारे वीज जोडणी देण्यासाठी नवीन योजना मे 2018 मध्ये जाहिर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मार्च 2018 पर्यंत 2.5 लाख कृषिपंपाना वीज जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारणार असून उत्पादकता वाढेल. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरू करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे कृषि फीडर द्वारे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत विज पुरवठा करण्यात येणार आहे. राळेगण सिध्दी व कोळंबी याठिकाणी प्रकल्प सुरु झाले आहेत. अन्य ठिकाणीही प्रकल्प सुरु होणार आहेत.