शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:31 IST

डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देडिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक शेतकऱ्यांवर मोठे संकट

बांदा : डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.या आगीत विजय गोपाळ सावंत, लवू रामचंद्र सावंत, सोंडो भिवा सावंत, लक्ष्मण सुरेश सावंत, रामा शंभू सावंत या शेतकऱ्यांची सुमारे २५० काजू कलमे जळून खाक झाली.शनिवारी दुपारी आपल्या बागायतीमधील काम आटोपून बहुतांशी शेतकरी जेवणासाठी गेले होते. बागायतीमधून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.

स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बंबाद्वारे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्यात आली.यावेळी ग्रामसेवक एल. एस. परब, कृषी सहाय्यक रुपाली पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप धुरी, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डिंगणे सरपंच जयेश सावंत, दिनेश सावंत, शंकर सावंत, फटू सावंत, संतोष नाईक, तनय नाईक, राजू सावंत, शिवराम सावंत, यशवंत सावंत, ऋषिकेश सावंत, रवींद्र सावंत, महादेव सावंत, मनोज सावंत, तुषार सावंत, सुहासिनी सावंत, प्रगती सावंत, शुभम सावंत, विश्वास सावंत यांनी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग