शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

डिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:31 IST

डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

ठळक मुद्देडिंगणे येथील २५० काजू कलमे जळून खाक शेतकऱ्यांवर मोठे संकट

बांदा : डिंगणे येथील गोपाळ मळी येथे लागलेल्या आगीत सुमारे २५० काजू कलमांसह इतरही झाडे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी किरण गजीनकर यांनी केला.  ऐन काजू हंगाम तोंडावर असताना काजू बागायतीला आग लागल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.या आगीत विजय गोपाळ सावंत, लवू रामचंद्र सावंत, सोंडो भिवा सावंत, लक्ष्मण सुरेश सावंत, रामा शंभू सावंत या शेतकऱ्यांची सुमारे २५० काजू कलमे जळून खाक झाली.शनिवारी दुपारी आपल्या बागायतीमधील काम आटोपून बहुतांशी शेतकरी जेवणासाठी गेले होते. बागायतीमधून अचानक धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते.

स्थानिक शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सावंतवाडी नगरपरिषदेच्या बंबाद्वारे प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्यात आली.यावेळी ग्रामसेवक एल. एस. परब, कृषी सहाय्यक रुपाली पवार, बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप धुरी, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

डिंगणे सरपंच जयेश सावंत, दिनेश सावंत, शंकर सावंत, फटू सावंत, संतोष नाईक, तनय नाईक, राजू सावंत, शिवराम सावंत, यशवंत सावंत, ऋषिकेश सावंत, रवींद्र सावंत, महादेव सावंत, मनोज सावंत, तुषार सावंत, सुहासिनी सावंत, प्रगती सावंत, शुभम सावंत, विश्वास सावंत यांनी आग आटोक्यात आणण्यास प्रयत्न केले. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग