शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:26 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाचे बरसणे सुरूच आहे. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तिलारी, कर्ली सातंडी, देवधर या प्रमुख धरणांतून २३ हजार लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० धरणे पूर्णपणे भरली असून सध्या धरणांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले अनेक दिवस पावसाचे सातत्य असल्याने अनेक सकल भागांत पाणी साचून परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकजण यामुळे बाधित झाले असून कित्येकांना स्थलांतर करावे लागले आहे. अनेकांचा निवारा गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसांपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाच्या घाटांमध्ये दरड कोसळणे, महामार्गांवर, रस्त्यांवर झाडे कोसळणे, ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली जाणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. शासनाने एनडीआरएफची एक कमिटी जिल्हावासीयांच्या सेवेसाठी तैनात केली आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे महत्त्वाच्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामधून १०६०० क्युसेक, तर तिलारी जलविद्युतमधून ९६८ क्युसेस पाणीविसर्ग सुरू आहे. कर्ली सातंडी धरणातील पाण्याचा विसर्ग ११०५० क्युसेकने सुरू आहे; तर देवधर धरणातून १३५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ३५ धरणप्रकल्पांपैकी २० धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे सध्या या धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी ७५ वर पोहोचली आहे.२० धरणे १०० टक्के भरली२० धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव, कारीवडे, तीथवली यांचा समावेश आहे. तर उर्वरित धरणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसDamधरणriverनदी