शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 16:26 IST

अनेक गावांचा संपर्क तुटला

सिंधुदुर्गनगरी : गेल्या चार दिवसांपासून पावसाचे बरसणे सुरूच आहे. जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. तिलारी, कर्ली सातंडी, देवधर या प्रमुख धरणांतून २३ हजार लिटर क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २० धरणे पूर्णपणे भरली असून सध्या धरणांमध्ये ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले अनेक दिवस पावसाचे सातत्य असल्याने अनेक सकल भागांत पाणी साचून परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकजण यामुळे बाधित झाले असून कित्येकांना स्थलांतर करावे लागले आहे. अनेकांचा निवारा गेल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. गेल्या चार दिवसांपासून तर मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच जिल्ह्यातील महत्त्वाच्या घाटांमध्ये दरड कोसळणे, महामार्गांवर, रस्त्यांवर झाडे कोसळणे, ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली जाणे यासारखे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटल्याच्या घटनाही गेल्या काही दिवसांत घडल्या आहेत. शासनाने एनडीआरएफची एक कमिटी जिल्हावासीयांच्या सेवेसाठी तैनात केली आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे महत्त्वाच्या तिलारी आंतरराज्य प्रकल्पामधून १०६०० क्युसेक, तर तिलारी जलविद्युतमधून ९६८ क्युसेस पाणीविसर्ग सुरू आहे. कर्ली सातंडी धरणातील पाण्याचा विसर्ग ११०५० क्युसेकने सुरू आहे; तर देवधर धरणातून १३५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातील ३५ धरणप्रकल्पांपैकी २० धरणे ही पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे सध्या या धरणातील पाणीसाठ्याची टक्केवारी ७५ वर पोहोचली आहे.२० धरणे १०० टक्के भरली२० धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव, कारीवडे, तीथवली यांचा समावेश आहे. तर उर्वरित धरणे ७० टक्क्यांपेक्षा जास्त भरली आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसDamधरणriverनदी