शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

१६८९ कृषीपंपांना हवाय ‘करंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांचे लाखो रुपये वीज वितरणकडे पडून

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर अनेक आजवर अनेक योजना राबवित आले आहे. असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून तब्बल १६८९ कृषीपंप वीज जोडणीपासून प्रलंबित असल्याची बाब उघड झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ते संकटात सापडले आहेत. कृषीपंपासाठी शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरूनसुद्धा वीज पंपांना अजूनही ‘करंट’ मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासन विविध योजना आखत आहे. केवळ योजना आखून काय उपयोग? त्याची अंमलबजावणी झाली तर त्या योजनांना खऱ्या अर्थाने महत्व येते. शेतीपिकासाठी शासनाकडून खते-बी बियाणे पुरविली जातात. फळझाड लागवडही केली जाते. मात्र या सर्वांसाठी आवश्यक असणारे पाणी देण्यासाठी वीज कनेक्शन मात्र देण्यास वीज वितरण कंपनी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.विहिरींच्या किंवा नदी, तलाव इत्यादींच्या पाण्यावर शेती करता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप खरेदी केले आहेत. या पंपांच्या जोडणीसाठी या संबंधित शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे अनामत रक्कम भरून रितसर अर्जदेखील केले. मात्र या पंपाच्या जोडणीसाठी वीज कनेक्शन दिले नसल्याने हे पंप सध्या बंदावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. जिल्हा शेतकरी संघटनेनेही कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या वीज जोडणीसाठी प्रयत्न केले. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषीपंपाची योजना आणली. या कृषीपंपाच्या सहाय्याने खरीपासह रब्बी पिकांची लागवड करावी अशी अपेक्षा शासनाची आहे. मात्र शासनाच्या या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने ही योजना फोल ठरल्याचे बोलले जात आहे. शेतात विहिरी व बोअर खोदून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्जदेखील केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणादेखील केला. मात्र २०१५ पर्यंत जिल्ह्यात १६८९ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी असताना सिंचन करणे अशक्य आहे.कृषीपंपाला लागणाऱ्या वीजेच्या जोडणीसंदर्भात दर महिना जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सभांमधून प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येकवेळी या विषयावरून गरमागरम चर्चा केली जाते. मात्र ठोस निर्णय होताना दिसून येत नाही. वीज वितरणचे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींना सारवासारव करून उत्तरे देतात व विषय बंद करतात. लोकप्रतिनिधींनी वीज कनेक्शन जोडणीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊनसुद्धा ‘त्या’ सूचनांना अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होऊ शकत नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वत: लक्ष घालून पेंडिंग राहिलेली कृषी पंप वीज कनेक्शने मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला कृषीपंपाच्या जोडणीसाठी वीज पुरवठा मिळावा यासाठी अनामत रक्कम भरली आहे. एका कृषीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी साधारणत: अडीच ते तीन हजार रुपये अ‍ॅडव्हान्स भरावी लागते. त्यानुसार जिल्ह्यात १६८९ कृषीपंपाची साधारणत: लाखो रुपये अनामत रक्कम वीज वितरण कंपनीकडे असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.तालुका अनामत रक्कम भरून प्रलंबित राहिलेली कृषी पंपाची वीज जोडणीकणकवली९६देवगड३८३मालवण१७६वैभववाडी११६आचरा२१७वेंगुर्ला११५कुडाळ२०९सावंतवाडी१७३दोडामार्ग८४ओरोस१२०एकूण१६८९‘त्या’ ठेकेदाराबद्दल एवढी सहानुभूती का?जिल्ह्यातील कृषीपंपासाठी वीज जोडणीचा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून संबंधित काम हे कासवगतीने केले जात असल्यामुळे ‘त्या’ कंपनीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खडसावण्यात आल्याचेही समजते. सद्यस्थितीत या कंपनीची काही माणसे जिल्ह्यात कृषीपंपांना वीज जोडणीचे काम करत असल्याचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगत आऊटपूट काहीच निघत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर या ठेकेदाराकडून चांगल्या प्रकारे काम केले जात नसेल तर ‘त्या’ ठेकेदाराबद्दल सहानुभूती का? असा प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे.३८६ जणांनी केले कृषीपंपासाठी अर्ज१६८९ व्यतिरिक्त अन्य ३८६ जणांनी कृषीपंपासाठी अर्ज केल्याची बाब उघड झाली आहे. ३८६ जणांनी अनामत रक्कम न भरता केवळ अर्ज केले आहेत.