शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

१६८९ कृषीपंपांना हवाय ‘करंट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील स्थिती : शेतकऱ्यांचे लाखो रुपये वीज वितरणकडे पडून

गिरीश परब - सिंधुदुर्गनगरी -शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी आजवर अनेक आजवर अनेक योजना राबवित आले आहे. असे असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून तब्बल १६८९ कृषीपंप वीज जोडणीपासून प्रलंबित असल्याची बाब उघड झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ते संकटात सापडले आहेत. कृषीपंपासाठी शेतकऱ्यांनी अनामत रक्कम भरूनसुद्धा वीज पंपांना अजूनही ‘करंट’ मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे यासाठी शासन विविध योजना आखत आहे. केवळ योजना आखून काय उपयोग? त्याची अंमलबजावणी झाली तर त्या योजनांना खऱ्या अर्थाने महत्व येते. शेतीपिकासाठी शासनाकडून खते-बी बियाणे पुरविली जातात. फळझाड लागवडही केली जाते. मात्र या सर्वांसाठी आवश्यक असणारे पाणी देण्यासाठी वीज कनेक्शन मात्र देण्यास वीज वितरण कंपनी टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत आहे.विहिरींच्या किंवा नदी, तलाव इत्यादींच्या पाण्यावर शेती करता यावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीपंप खरेदी केले आहेत. या पंपांच्या जोडणीसाठी या संबंधित शेतकऱ्यांनी वीज वितरणकडे अनामत रक्कम भरून रितसर अर्जदेखील केले. मात्र या पंपाच्या जोडणीसाठी वीज कनेक्शन दिले नसल्याने हे पंप सध्या बंदावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. जिल्हा शेतकरी संघटनेनेही कृषीपंप जोडणीसाठी लागणाऱ्या वीज जोडणीसाठी प्रयत्न केले. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येत आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी कृषीपंपाची योजना आणली. या कृषीपंपाच्या सहाय्याने खरीपासह रब्बी पिकांची लागवड करावी अशी अपेक्षा शासनाची आहे. मात्र शासनाच्या या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी न झाल्याने ही योजना फोल ठरल्याचे बोलले जात आहे. शेतात विहिरी व बोअर खोदून वीज वितरण कंपनीकडे रितसर अर्जदेखील केले. त्यासाठी आवश्यक त्या रकमेचा भरणादेखील केला. मात्र २०१५ पर्यंत जिल्ह्यात १६८९ शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळालेली नाही. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी असताना सिंचन करणे अशक्य आहे.कृषीपंपाला लागणाऱ्या वीजेच्या जोडणीसंदर्भात दर महिना जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या सभांमधून प्रश्न उपस्थित होतो. प्रत्येकवेळी या विषयावरून गरमागरम चर्चा केली जाते. मात्र ठोस निर्णय होताना दिसून येत नाही. वीज वितरणचे संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींना सारवासारव करून उत्तरे देतात व विषय बंद करतात. लोकप्रतिनिधींनी वीज कनेक्शन जोडणीबाबत अधिकाऱ्यांना सूचना देऊनसुद्धा ‘त्या’ सूचनांना अधिकारी जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होऊ शकत नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी स्वत: लक्ष घालून पेंडिंग राहिलेली कृषी पंप वीज कनेक्शने मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्याला कृषीपंपाच्या जोडणीसाठी वीज पुरवठा मिळावा यासाठी अनामत रक्कम भरली आहे. एका कृषीपंपाच्या वीज कनेक्शनसाठी साधारणत: अडीच ते तीन हजार रुपये अ‍ॅडव्हान्स भरावी लागते. त्यानुसार जिल्ह्यात १६८९ कृषीपंपाची साधारणत: लाखो रुपये अनामत रक्कम वीज वितरण कंपनीकडे असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.तालुका अनामत रक्कम भरून प्रलंबित राहिलेली कृषी पंपाची वीज जोडणीकणकवली९६देवगड३८३मालवण१७६वैभववाडी११६आचरा२१७वेंगुर्ला११५कुडाळ२०९सावंतवाडी१७३दोडामार्ग८४ओरोस१२०एकूण१६८९‘त्या’ ठेकेदाराबद्दल एवढी सहानुभूती का?जिल्ह्यातील कृषीपंपासाठी वीज जोडणीचा ठेका मुंबईतील एका कंपनीला देण्यात आला आहे. या कंपनीकडून संबंधित काम हे कासवगतीने केले जात असल्यामुळे ‘त्या’ कंपनीला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून खडसावण्यात आल्याचेही समजते. सद्यस्थितीत या कंपनीची काही माणसे जिल्ह्यात कृषीपंपांना वीज जोडणीचे काम करत असल्याचे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगत आऊटपूट काहीच निघत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर या ठेकेदाराकडून चांगल्या प्रकारे काम केले जात नसेल तर ‘त्या’ ठेकेदाराबद्दल सहानुभूती का? असा प्रश्न शेतकऱ्यांत उपस्थित होत आहे.३८६ जणांनी केले कृषीपंपासाठी अर्ज१६८९ व्यतिरिक्त अन्य ३८६ जणांनी कृषीपंपासाठी अर्ज केल्याची बाब उघड झाली आहे. ३८६ जणांनी अनामत रक्कम न भरता केवळ अर्ज केले आहेत.