शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

युवा शेतकऱ्याने एकरभर शेतीत घेतले पंधरा लाख रुपयांचे अद्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 12:33 IST

यशकथा : दुष्काळी तालुक्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

- रशिद शेख (औंध, जि. सातारा)

बाजारपेठेचा अभ्यास, शेतीकडे लक्ष आणि जिद्द असेल, तर एखादा शेतकरी अल्पशा जमिनीतूनही लाखो रुपयांचे उत्पन्न घेऊ शकतो. असेच उदाहरण घालून दिले आहे ते खटाव तालुक्यातील औंध येथील उमेश जगदाळे या युवा शेतकऱ्याने. त्यांनी एकरभर शेतीक्षेत्रात विक्रमी आल्याचे (अद्रक) उत्पादन घेतले आहे. या उत्पादित आल्याला सध्याच्या बाजारभावाने १५ लाख रुपये मिळाले आहेत. दुष्काळी तालुक्यात काढलेल्या या विक्रमी उत्पादनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

सातारा जिल्ह्यातील औंध येथील उमेश गोविंद जगदाळे हे शिक्षण घेऊनही नोकरी न लागल्याने शेती व्यवसायाकडे वळले. उमेश व रमेश जगदाळे या दोन्ही बंधूंना प्रगतशील शेतीचा सुरुवातीपासूनच ध्यास आहे. येथील दुष्काळी भागात बटाटा हे पीक प्रमुख नगदी पीक मानले जाते; परंतु उमेश जगदाळे यांनी आले पिकाची निवड केली. मे २०१७ मध्ये त्यांनी आल्याची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. त्याअगोदर त्यांनी आपल्या एका एकरात तब्बल दहा ट्रॉली शेणखत टाकले. त्यानंतर वेळच्या वेळी लक्ष देऊन पिकाची निगा राखली. आवश्यक खते, कीटकनाशके, भर टाकणे आदी मशागतीची कामे त्यांनी वेळेत केली. 

आले पिकाची त्यांनी तब्बल १७ महिने संपूर्ण काळजी घेतली. आल्याचे हे पीक ठिबकद्वारे भिजवले, त्यासाठी बेड पद्धतीचा अवलंब केला. या पिकास १ लाख रुपये खर्च आला असून, विक्रीतून १५ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेती कशी फायदेशीर करावी, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शेणखत व फवारणीत गोमूत्राचा वापर करण्यात आला होता. इंटरनेट तसेच चर्चासत्रातून ज्ञान वाढवले. व्यापाऱ्यांनी जागेवरच विक्री केल्यामुळे वाहतूक, कमिशन, अडत, हमाली आदी खर्च वाचला आहे, त्यामुळे त्यांच्या हातात चांगले पैसे आले आहेत.

गेल्या आठ वर्षांपासून शेती करणारे जगदाळे कुटुंबीय हे नेहमी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणारे औंध भागातील शेतकरी आहेत. यापूर्वीही त्यांनी कांदा, मेथी, बटाटा आणि वांग्याचे परिसरात एक नंबरचे उत्पादन घेतले होते. उमेश जगदाळे हे जास्तीत-जास्त शेणखत व गरजेपुरते रासायनिक खतांचा वापर करून आपल्या  प्रत्येक पिकाचे उत्पादन दर्जेदार कसे राहील याकडे बारकाईने लक्ष देतात.

या भागातील अनेक छोटे-मोठे शेतकरी जगदाळे यांचे मार्गदर्शन घेत असतात. कोणतीही शेतीविषयक पदवी नसताना फक्त अनुभव व उत्कृष्ट नियोजन या जोरावर उमेश जगदाळे  हे नेहमी भरघोष उत्पन्न मिळविण्यात यशस्वी होत आहे. एखाद्या पिकाची लागवडीसाठी निवड करताना, मी त्याचा खर्च, वेळ, बाजारातील परिस्थिती काय आहे याचा विचार करीत असतो. आपले पीक दर्जेदार व उत्तम येण्यासाठी काय करावे, याचे नियोजन डोक्यात ठेवणे आवश्यक आहे. दुष्काळ असल्याने कमी पाण्यात उत्पन्न घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे उमेश जगदाळे यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी