शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
3
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
4
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
5
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
6
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
7
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
8
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
9
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
10
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
11
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
12
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
13
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
14
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
15
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
16
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
17
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
20
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान

यंदाचा गणेशोत्सव थर्माकोलमुक्त; व्यापाऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:57 PM

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी ...

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : न्यायालयाने थर्माकोलवरील बंदीचा निर्णय कायम ठेवला असून, या निर्णयाचा सर्वात मोठा फटका जिल्ह्यातील व्यापारी व गणेश मंडळांना बसला आहे. गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला असून, थर्माकोलपासून तयार केले जाणारे डेकोरेशन यंदाच्या उत्सवात पाहावयास मिळणार नाही. या बंदीमुळे व्यापाºयांना लाखो रुपयांचा फटका बसणार असला तरी न्यायालयाच्या या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींनी कौतुक केले आहे.राज्य शासनाने २३ जूनपासून सर्वत्र प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू केला. या निर्णयाची प्रशासनाकडून सर्वत्र काटेकोरपणे अमंलबजावणी करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत प्लास्टिक पिशव्यांसह थर्माकोलच्या वस्तू मोठ्या प्रमाणात जप्त करून दुकानदार व व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. पालिकेच्या पथकाने केलेल्या या कारवाईची धास्ती घेऊन दुकानदारांनी प्लास्टिकचा वापर टाळला असला तरी थर्माकोलला या बंदीतून सूट द्यावी, अशी मागणी थर्माकोल फॅब्रिकेटर आणि डेकोरेशन समितीने उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवल्याने याचा मोठा फटका व्यापाºयांना बसला आहे.पूर्वी गणपती प्रतिष्ठापनेसाठी घरीच सजावट केली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून थर्माकोलपासून बनविण्यात येणारी आसने, लायटिंगचे मंदिर, सिंहासन, पालखी अशा विविध आरास साहित्याची मागणी गणेश मंडळांकडून होऊ लागली आहे. गणेशोत्सवाच्या एक-दोन महिने अगोदर थर्माकोलचा वापर करून मकर व इतर वस्तू तयार केल्या जातात. उत्सवकाळात सजावटीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. गणेशोत्सवात थर्माकोलच्या खरेदी विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा थर्माकोल बंदीमुळे ही उलाढाल थांबणार असून, पूर्वीप्रमाणेचे पारंपरिक रंगबिरंगी पडदे, कागद व लाकडापासून बनविल्या जाणाºया शोभिवंत वस्तूंना मागणी वाढणार आहे.हे आहेत तोटे...थर्माकोल हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे.त्याचे लवकर विघटन होत नाही.पर्यावरणासाठी हा अत्यंत घातक घटक आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडतो.जलस्त्रोतांवरही विपरित परिणाम होतो.थर्माकोल जळाल्यानंतर निघणारा वायू हा घातक असतो.या वायूचा ओझोनवरही परिणाम होता.