शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

World Population Day: सातारी जोडप्यांचा कुटुंब नियोजनात ‘मनाचा ब्रेक’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:31 IST

शस्त्रक्रियेची वाटेना गरज : एका अपत्यावरही थांबवतात पाळणा हलवणं

सातारा : वाढती लोकसंख्या ही विकासात बाधक ठरत असते. शासनातर्फे लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. याचा चांगला परिणाम होत असल्याचे समोर येत आहे. दोन-तीन दशकांपूर्वी कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया केली जात होती. काही वर्षांपासून नवीन जोडपे शस्त्रक्रिया करण्याऐवजी कुटुंबनियोजन साधनांचा वापर करत आहेत. त्यांच्या मनाच्या ब्रेकमुळे लोकसंख्या वाढीला आळा बसत आहे.सातारा जिल्ह्यातील जनता ही कायम चांगल्या गोष्टीचा स्वीकार करत असते. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनांना त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. याचाच अनुभव लोकसंख्येच्या बाबतीतही अनुभवास मिळत आहे. आणीबाणीच्या काळात तर पुरुषांची धरपकड करुन कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया केली जात होती. त्याचा फटका इंदिरा गांधी सरकारला बसला होता.साधारणत: ऐंशीच्या दशकात ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ अशी जनजागृती करुन किमान तीन अपत्यानंतर थांबण्याचा सल्ला दिला जात होता. त्यानंतर ‘हम दो, हमारे दो’ची घोषणा देण्यात आली. यामध्ये दोन मुले, उज्ज्वल भविष्य, जास्त मुले कुठे भविष्य? असा प्रश्नही विचारला जात होता. पण आता कोठेही जाहिरातीची गरज भासत नाही. नवीन पिढीच चांगले-वाईट जाणत असल्याने त्यांनी कुटुंब नियोजनावर भर दिला आहे.

आरोग्य यंत्रणेला ना सक्ती उद्दिष्टाची

लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून लोकसंख्येचा विचार करुन कर्मचाऱ्यांना कुटुंब नियोजनाचे उद्दिष्ट दिले जात होते. त्याप्रमाणे ते गाव, खेडी, वस्तीवर जाऊन जोडप्यांना प्रवृत्त करत असत. उद्दिष्ट साध्य न झाल्यास वरिष्ठांची बोलणी ऐकावी लागत. पण आता उद्दिष्ट पूर्ण होत नाही, तरीही फारसा फरक पडत नसल्याचे लक्षात आले आहे.ग्रामीण भागात आरोग्य कर्मचारीच प्रचारकशहरी भागात औषधांच्या दुकानांमध्ये निरोध सहज मिळतात. पण ग्रामीण भागात ही साधनं सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे नवदाम्पत्यांपर्यंत ही साधनं पोहोचविण्याची जबाबदारी आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य निरीक्षक यांच्यावर येऊन पडत असते. ते ही साधनं वापरण्याबाबत जागृती करत असतात.

कुुटुंब नियोजनाच्या उपलब्ध पद्धतींबद्दल जोडप्यांचे समुपदेशन केले जाते. यासाठी कुटुंबनियोजन सेवांबाबत जिल्हास्तरावरून कॅलेंडर तयार करुन त्यांचे वाटप केले जाते. - डाॅ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सातारा.