शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बारामतीकरांची मक्तेदारी माेडून काढू, जयकुमार गोरे यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 3:48 PM

बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं.

पाचगणी : ‘यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार समजायचं, त्यांच्याच सातारा जिल्ह्यात त्यांनी आपला पक्ष वाढवला; पण ४० वर्षे पाठीशी राहिलेल्या या सातारा जिल्ह्याला त्यांनी काय दिलं, हा प्रश्न आज ही अनुत्तरित आहे. सर्व विकासकेंद्रे बारामतीला नेली, औंधचं संस्थानही त्यांनी ताब्यात घेतलं. त्यांनी दिलं काय ? आता त्यांची मक्तेदारी मोडून काढण्याची वेळ आली आहे,’ असा घणाघात भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार जयकुमार गोरे यांनी केला. भिलार, ता. महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणी बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराच्या समारोपप्रसंगी जिल्हाध्यक्ष गोरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे म्हणाले, ‘ज्या योजनेतून अनेकांचे जीव वाचले, अनेकांच्या संसाराला हातभार लागला ती मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजना बंद करणारा पहिले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी अथक परिश्रमातून तयार केलेला अर्थसंकल्प वाचताना उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे सुतकी चेहरे पाहण्यासारखे होते. आपण बहुमताने निवडून आलो; पण सत्तेच्या बाहेर राहावं लागलं. बारामतीकरांच्या नादाला लागून शेताचा बांध न पाहिलेला आणि शेतकऱ्यांना त्रास होणारा मुख्यमंत्री खुर्चीवर बसला आणि महाराष्ट्रावर मोठं संकट आलं. वेदना झाल्या; पण आता विचार करण्याची वेळ आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार यासाठी काम सुरू आहे.’‘पवारांनी संस्थानिक, बँका, सभासद ताब्यात ठेवले आहेत. आपल्या ताब्यात काय आहे ?  त्यांच्या बालेकिल्ल्यातील सातारा जिल्हा बँकेने आजपर्यंत एकही नवा सभासद केला नाही. जिल्ह्यात लढाई विचारांची आहे, ती राष्ट्रवादी बरोबर आहे, त्यांचा पाडाव करण्याची मानसिकता असायला पाहिजे. एवढ्या मोठ्या नेत्यांवर का बोलता ? असं मला अनेकदा सांगितलं जातं; पण मी का कुणाला भ्यावं. मी लोकांसाठी बलिदान दिलं तर बिघडलं कुठं ?  देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत अनोखी ऊर्जा मिळते. प्रत्येक संकटाच्या वेळी फडणवीस पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रत्येक परिस्थितीत मजबुतीने पाठीशी उभा राहणारा भाजप पक्ष आहे, असेही जिल्हाध्यक्ष गोरे यांनी स्पष्ट केले.  यावेळी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनीही मार्गदर्शन केले. दोन दिवस चाललेल्या या मार्गदर्शन शिबिरात विविध मान्यवरांनी कार्यकर्त्यांना विचारांची शिदोरी दिली. या शिबिराला जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिबिराची जबाबदारी महाबळेश्वर तालुक्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. 

सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं...दोन दिवसांच्या या शिबिरातून कार्यकर्त्यांनी सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी  कामाला लागावे. आगामी काळात जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्याबरोबरच जिल्ह्यात जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करूयात. फलटणकरांनी कायम बारामतीकरांशी गोड बोलून सत्तेची भूक भागवली; पण त्यांच्या सत्तेच्या बदल्यात जिल्ह्यातील पाणी तिकडं पळवलं, हे पाप फलटणकरांनी जिल्ह्याच्या माथी मारलं, असे गोरे म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJaykumar Goreजयकुमार गोरेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवार