शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
4
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
5
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
6
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
7
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
8
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
9
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
10
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

पाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 15:03 IST

water scarcity Kas Bamnoli sataranews-बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच्या नूतन सरपंच जयश्री गोरे यांनी म्हावशी गावामध्ये ओढयालगत असणारा आड नावाचा पाणवठा उकरण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात दगड, गोठे, गाळ येऊन बसला होता. सरपंचांनी महिला व युवकांना प्रेरित करून गाळ काढण्याचे ठरविले. स्वतः पाच तास श्रमदान केले. यातून तीन ट्रॉली गाळ काढला.

ठळक मुद्देपाणीटंचाई मिटणार : सरपंचांनी श्रमदानातून पिण्याच्या पाणवठा स्वच्छपिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीचा कोणताही निधी न घेता तीन ट्रॉली गाळ काढला

बामणोली : बामणोली ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या साईनगर, म्हावशी व सावरी गावांना डोंगरातील झऱ्यांचे गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणीपुरवठा होत आहे. परंतु सध्या या झऱ्यांचे पाणी खूपच कमी झाले आहे. यावर उपाय म्हणून बामणोलीच्या नूतन सरपंच जयश्री गोरे यांनी म्हावशी गावामध्ये ओढयालगत असणारा आड नावाचा पाणवठा उकरण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात दगड, गोठे, गाळ येऊन बसला होता. सरपंचांनी महिला व युवकांना प्रेरित करून गाळ काढण्याचे ठरविले. स्वतः पाच तास श्रमदान केले. यातून तीन ट्रॉली गाळ काढला.उन्हाळा सुरू झाल्याने पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग हा सह्याद्री पर्वतरांगांच्या तीव्र उतार व डोंगरदऱ्या खोऱ्यांनी वेढलेला आहे. पावसाळ्यात सर्वाधिक पाऊस पडूनही पाणी वाहून जाते. तीव्र उतारामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. उन्हाळ्यात बामणोली, तापोळा, कास परिसरातील अनेक गावे, वाड्या, वस्त्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तो स्वच्छ केल्याने हा पाणवठा गावाबाहेर जंगला जवळ असल्याने जंगलातील ससे, हरणे, मोर, डुक्कर व अनेक पक्षी यांना उन्हाळभर पिण्यासाठी उपयोग होणार आहे.

म्हावशी गावात उन्हाळ्यामुळे पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यावर उपाय म्हणून मी महिला व तरुणांना माहिती देऊन गावच्या जुन्या पाणवठ्यातील गाळ काढण्याचा निर्णय घेतला. स्वतः त्यांच्याबरोबर श्रमदान करून तीन ट्रॉली गाळ काढला. या श्रमदानासाठी मी ग्रामपंचायतीचा कोणताही निधी खर्च केला नाही.- जयश्री गोरे,सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत बामणोली कसबे ता. जावली.

गावच्या सरपंचांनी आम्हाला पाणवठ्यातील गाळ काढण्याचे आवाहन केले. आम्ही दहा, बारा जणांनी सुमारे पाच तास श्रमदान करून पाणवठा स्वच्छ केला. तेथे स्वच्छ पाणी साठले आहे. या पाण्याचा माणसांबरोबर जनावरे तसेच वन्यप्राणी व पक्ष्यांनाही पिण्यासाठी होणार आहे.- अंकुश उतेकर,ग्रामस्थ म्हावशी ता. जावळी.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठार