शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच; आपत्कालीन दरवाजा बंद

By नितीन काळेल | Updated: March 7, 2024 17:46 IST

वीजगृहातूनच २१०० क्यूसेक विसर्ग 

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. तर १५ दिवसानंतर आपत्कालिन द्वारमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कोयनेतील पाण्याला मागणी वाढणार अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे गेल्यावर्षी नोव्हेंबरपासूनच कोयनेतून पाणी विसर्ग सुरू झाला.

कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालिन द्वारमधूनही एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. या कारणाने सांगलीसाठी पायथा वीजगृह आणि आपत्कालिन द्वार असे दोन्हीकडील मिळून ३१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू होता.मात्र, गुरुवारपासून धरणाचे आपत्कालिन द्वार बंद करण्यात आले आहे. यामुळे सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू आहेत. त्यातूनच २१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. हे पाणीही सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठीच जात आहे.

३१ मेपर्यंतचे नियोजन करावे लागणार..कोयना धरणात सध्या ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ३१ मेपर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. यामध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर शेतीला फायदा होतो. तसेच पिण्याच्या पाणी योजनांनाही धरणातील पाणी सोडावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीDamधरणWaterपाणी