शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

कोयनेतून सांगलीच्या सिंचनासाठी पाणी सुरूच; आपत्कालीन दरवाजा बंद

By नितीन काळेल | Updated: March 7, 2024 17:46 IST

वीजगृहातूनच २१०० क्यूसेक विसर्ग 

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. तर १५ दिवसानंतर आपत्कालिन द्वारमधील पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोयना धरण आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले होते. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस कमी राहिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९५ टीएमसीच्या उंबरठ्यावरच पोहोचला होता. परिणामी सातारा, सांगली जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने कोयनेतील पाण्याला मागणी वाढणार अशी चिन्हे होती. त्याप्रमाणे गेल्यावर्षी नोव्हेंबरपासूनच कोयनेतून पाणी विसर्ग सुरू झाला.

कोयनेतील पाण्यावर पिण्याच्या आणि सिंचन योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी वारंवार पाणी सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात तर सांगलीच्या पाटबंधारे विभागाकडून सिंचन मागणीत वाढ झाली. त्यामुळे कोयना धरणाच्या आपत्कालिन द्वारमधूनही एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. या कारणाने सांगलीसाठी पायथा वीजगृह आणि आपत्कालिन द्वार असे दोन्हीकडील मिळून ३१०० क्यूसेक पाणी विसर्ग सुरू होता.मात्र, गुरुवारपासून धरणाचे आपत्कालिन द्वार बंद करण्यात आले आहे. यामुळे सध्या पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरू आहेत. त्यातूनच २१०० क्यूसेक वेगाने पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. हे पाणीही सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठीच जात आहे.

३१ मेपर्यंतचे नियोजन करावे लागणार..कोयना धरणात सध्या ६२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ३१ मेपर्यंत पुरवावे लागणार आहे. या धरणातील पाण्यावर महत्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून आहेत. यामध्ये टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या योजनांचा समावेश आहे. या योजनांसाठी पाणी विसर्ग करण्यात येतो. त्यातून शेकडो हेक्टर शेतीला फायदा होतो. तसेच पिण्याच्या पाणी योजनांनाही धरणातील पाणी सोडावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीDamधरणWaterपाणी