शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

कारखान्याच्या गव्हाणीत उड्या मारण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:16 IST

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही येत्या चार ...

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी लाखो टन उसाचे गाळप करून सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केले नाही येत्या चार दिवसांत रक्कम जमा न केल्यास रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते ऊस कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेल्यानंतर १४ दिवसाच्या आत एफआरपीची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करणे हे कारखान्यांसाठी बंधनकारक आहे. १४ दिवसांपेक्षा ज्यादा कालावधी होऊनदेखील उसाच्या बिलाच्या एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. कारखानदार शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असून, कायदेशीर कारवाई केली जात नाही.

२०२०-२०२१ या गळीत हंगामातील गाळप झालेल्या उसाची एफआरपीची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यात यावी, ही रक्कम येत्या चार दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही तर रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते साखर कारखान्यांच्या गव्हाणीत उड्या मारतील, असा इशारा रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यावेळी रयत क्रांती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर शिंदे, जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव आदी उपस्थित होते.