शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:30 IST

धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून हेलपाटे : धोम डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने ५९ खातेदारांची आर्थिक कोंडीशेतकºयांची विवंचना... भाग : १

सागर गुजर ।सातारा : धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कालव्याला भगदाड पडून पाणी वनगळ व मालगावातील शेतात शिरले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ भरला. शेतातील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे एकूण ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले होते. तर वनगळमधील १५ शेतकºयांचे ५ लाख १६ हजार नुकसान झाले होते.

कालव्याला भगदाड पडून वाहिलेल्या पाण्यामुळे उकिरड्याचे शेतखत, हळद बियाणे, कडबा, जळण, हरभरा पीक, खते, सिमेंट पोती आदी वाहून गेले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ साठला. विद्युत मोटारीही बंद पडल्या. अद्यापही हे शेतकरी या आपत्तीतून सावरलेले नाहीत.या नुकसानीचे महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र केवळ पंचनामे केले गेले, त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांवर आलेल्या आपत्तीवर फुंकर घालण्याचे काम अद्याप झालेले नाही.मालगाव ग्रामपंचायतीचे ११ लाखांचे नुकसानया आपत्तीत मालगाव ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे ११ लाखांचे नुकसान झाले. ओढ्यालगतची स्मशानभूमी वाहून गेली. सिमेंट पोती, बांधकामाच्या फळ्या वाहून गेल्या. मालगाव-शिवथर रस्त्यावरील भराव वाहून गेला. मालगाव-शिवथर मार्गावरील ओढ्यात पाईप वाहून पुलाला दोन्ही बाजूंना भगदाड पडले होते. हे नुकसान शासकीय खात्यामार्फत दुरुस्त करण्यात येऊ शकते, असा अहवाल महसूल खात्याने दिला होता.दोन्ही गावांचे ८२ लाखांचे नुकसानधोम धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून वनगळ व मालगाव या दोन गावांतील शेतकºयांचे एकूण ८२ लाख रुपयांचे नकुसान झाले होते. यापैकी अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यापैकी काहींचा शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय आहे. कालवा फुटून अनेकांच्या वैरणीच्या गंजी वाहून गेल्या. उभी पिके वाहून गेली. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. शासनाच्या मालमत्तेमुळेच हे नुकसान झाले असून भरपाई मिळणे जरुरीचे आहे. सध्या त्या भागातील शेतकरी भरपाई वंचित आहे. अजून तेथील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

मालगाव आणि वनगळ या दोन्ही गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. न्याय मिळेपर्यंत संघटना शांत बसणार नाही.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी 

शेतकरी उमेदीने पिके घेतात. शेणखत, बियाणे, जनावरांचा कडबा या गोष्टींचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची काय अवस्था होते, हे शासकीय अधिकाºयांनी समजावून घ्यावे.- अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी नेते

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी