शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:30 IST

धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून हेलपाटे : धोम डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने ५९ खातेदारांची आर्थिक कोंडीशेतकºयांची विवंचना... भाग : १

सागर गुजर ।सातारा : धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कालव्याला भगदाड पडून पाणी वनगळ व मालगावातील शेतात शिरले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ भरला. शेतातील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे एकूण ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले होते. तर वनगळमधील १५ शेतकºयांचे ५ लाख १६ हजार नुकसान झाले होते.

कालव्याला भगदाड पडून वाहिलेल्या पाण्यामुळे उकिरड्याचे शेतखत, हळद बियाणे, कडबा, जळण, हरभरा पीक, खते, सिमेंट पोती आदी वाहून गेले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ साठला. विद्युत मोटारीही बंद पडल्या. अद्यापही हे शेतकरी या आपत्तीतून सावरलेले नाहीत.या नुकसानीचे महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र केवळ पंचनामे केले गेले, त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांवर आलेल्या आपत्तीवर फुंकर घालण्याचे काम अद्याप झालेले नाही.मालगाव ग्रामपंचायतीचे ११ लाखांचे नुकसानया आपत्तीत मालगाव ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे ११ लाखांचे नुकसान झाले. ओढ्यालगतची स्मशानभूमी वाहून गेली. सिमेंट पोती, बांधकामाच्या फळ्या वाहून गेल्या. मालगाव-शिवथर रस्त्यावरील भराव वाहून गेला. मालगाव-शिवथर मार्गावरील ओढ्यात पाईप वाहून पुलाला दोन्ही बाजूंना भगदाड पडले होते. हे नुकसान शासकीय खात्यामार्फत दुरुस्त करण्यात येऊ शकते, असा अहवाल महसूल खात्याने दिला होता.दोन्ही गावांचे ८२ लाखांचे नुकसानधोम धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून वनगळ व मालगाव या दोन गावांतील शेतकºयांचे एकूण ८२ लाख रुपयांचे नकुसान झाले होते. यापैकी अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यापैकी काहींचा शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय आहे. कालवा फुटून अनेकांच्या वैरणीच्या गंजी वाहून गेल्या. उभी पिके वाहून गेली. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. शासनाच्या मालमत्तेमुळेच हे नुकसान झाले असून भरपाई मिळणे जरुरीचे आहे. सध्या त्या भागातील शेतकरी भरपाई वंचित आहे. अजून तेथील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

मालगाव आणि वनगळ या दोन्ही गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. न्याय मिळेपर्यंत संघटना शांत बसणार नाही.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी 

शेतकरी उमेदीने पिके घेतात. शेणखत, बियाणे, जनावरांचा कडबा या गोष्टींचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची काय अवस्था होते, हे शासकीय अधिकाºयांनी समजावून घ्यावे.- अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी नेते

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी