शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

मालगाव, वनगळचे शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:30 IST

धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

ठळक मुद्देमार्च महिन्यापासून हेलपाटे : धोम डाव्या कालव्याला भगदाड पडल्याने ५९ खातेदारांची आर्थिक कोंडीशेतकºयांची विवंचना... भाग : १

सागर गुजर ।सातारा : धोम डाव्या कालव्याला ११ मार्च २०१९ रोजी भगदाड पडून सातारा तालुक्यातील मालगाव, वनगळ या दोन गावांतील ५९ शेतकऱ्यांच्या शेती तसेच शेतमालाचे मोठे नुकसान झाले होते. हे शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.

कालव्याला भगदाड पडून पाणी वनगळ व मालगावातील शेतात शिरले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ भरला. शेतातील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले होते. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात मालगावातील ४४ शेतकऱ्यांचे एकूण ७७ लाख ११ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले होते. तर वनगळमधील १५ शेतकºयांचे ५ लाख १६ हजार नुकसान झाले होते.

कालव्याला भगदाड पडून वाहिलेल्या पाण्यामुळे उकिरड्याचे शेतखत, हळद बियाणे, कडबा, जळण, हरभरा पीक, खते, सिमेंट पोती आदी वाहून गेले होते. तसेच विहिरींमध्ये गाळ साठला. विद्युत मोटारीही बंद पडल्या. अद्यापही हे शेतकरी या आपत्तीतून सावरलेले नाहीत.या नुकसानीचे महसूल विभाग व पाटबंधारे विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र केवळ पंचनामे केले गेले, त्यानंतर चार महिने उलटून गेले तरी शेतकरी सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकºयांवर आलेल्या आपत्तीवर फुंकर घालण्याचे काम अद्याप झालेले नाही.मालगाव ग्रामपंचायतीचे ११ लाखांचे नुकसानया आपत्तीत मालगाव ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचे ११ लाखांचे नुकसान झाले. ओढ्यालगतची स्मशानभूमी वाहून गेली. सिमेंट पोती, बांधकामाच्या फळ्या वाहून गेल्या. मालगाव-शिवथर रस्त्यावरील भराव वाहून गेला. मालगाव-शिवथर मार्गावरील ओढ्यात पाईप वाहून पुलाला दोन्ही बाजूंना भगदाड पडले होते. हे नुकसान शासकीय खात्यामार्फत दुरुस्त करण्यात येऊ शकते, असा अहवाल महसूल खात्याने दिला होता.दोन्ही गावांचे ८२ लाखांचे नुकसानधोम धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड पडून वनगळ व मालगाव या दोन गावांतील शेतकºयांचे एकूण ८२ लाख रुपयांचे नकुसान झाले होते. यापैकी अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यापैकी काहींचा शेतीला पूरक असणारा दुग्धव्यवसाय आहे. कालवा फुटून अनेकांच्या वैरणीच्या गंजी वाहून गेल्या. उभी पिके वाहून गेली. यातून ते अजूनही सावरलेले नाहीत. शासनाच्या मालमत्तेमुळेच हे नुकसान झाले असून भरपाई मिळणे जरुरीचे आहे. सध्या त्या भागातील शेतकरी भरपाई वंचित आहे. अजून तेथील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. 

मालगाव आणि वनगळ या दोन्ही गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. न्याय मिळेपर्यंत संघटना शांत बसणार नाही.- राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी 

शेतकरी उमेदीने पिके घेतात. शेणखत, बियाणे, जनावरांचा कडबा या गोष्टींचे नुकसान झाल्यानंतर शेतकºयांची काय अवस्था होते, हे शासकीय अधिकाºयांनी समजावून घ्यावे.- अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी नेते

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीWaterपाणी