शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वडूज वाढलं ; पण बसस्थानक आक्रमलं !

By admin | Updated: August 12, 2015 20:50 IST

शौचालयाचाही प्रश्न निर्माण : अधिकारी का ठेकेदार जबाबदार?

शेखर जाधव- वडूज  वडूज बसस्थानकात विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. याच परिसरात स्वच्छातागृह असून अडचण नसून खोळंबा, अशा स्थितीत आहे. जिल्ह्यात बसस्थानके कात टाकण्याच्या स्थितीत असताना वडूजमध्ये त्याचा कोठेही मागमूस दिसत नाही. या सर्व बाबींसाठी संबंधित ठेकेदार का अधिकारी जबाबदार आहेत, असा प्रश्न पडत आहे. वर्षापूर्वी एस. टी. महामंडळाच्या बांधकाम विभागाच्या नियोजनानुसार वडूज बसस्थानक परिसराला संरक्षक भिंतीसाठी सहा लाख मंजूर झाले. काही महिन्यांत या कामाचा शुभारंभ देखील झाला. बसस्थानक परिसरातील संरक्षक भिंतीच्या कामासाठी पायाभरणी करून काम काही प्रमाणात पूर्ण करण्यात आले. मुबलक पाणीसाठा असताना देखील पाणी मारण्यात येत नसल्याच्या तोंडी तक्रारीही प्रवाशांनी व ग्रामस्थांनी आगार प्रमुखांकडे केल्या होत्या. कारण ही संरक्षक भिंत जास्तकाळ टिकू नये असाच हेतू होता की काय, असा प्रश्नही सर्वसामान्य वडूजकरांना पडलेला होता. या कामाकडे संबंधित ठेकेदाराचे नेमके दुर्लक्ष का, यासाठी वेळोवेळी गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारणा केली. दीड फूट उंच दगडी बांधकाम, त्यावर लोखंडी अँगल आणि त्यावर जुना पत्रा बसविण्यात येणार असल्याची माहिती या ठेकेदाराने दिली. जुना पत्रा काही अंशी गंजल्यामुळे नव्या पत्र्याची मागणी संबंधित विभागाकडे केली असल्याची माहितीही यावेळी त्या ठेकेदाराने दिली होती. त्यामुळे या कामासाठी लागणारे इतर साहित्य मागणीनुसार लवकरच मिळेल आणि मुदतीच्या आत हे काम पूर्ण होईल, अशी खात्री या ठेकेदाराने दिली होती. शाळा सुरू होण्यापूर्वी हे संरक्षक भिंतीचे काम होणे आवश्यक होते. कारण या कामासाठी होणारी दिरंगाई संभाव्य धोके निर्माण करू शकते. कामानिमत्त बाहेरगावी असणारे लोकांची वारंवार ये-जा सुरूच असते. एस.टी. ची वाट बघत बसणाऱ्या प्रवाशांना या बसस्थानक परिसराला परिपूर्ण नसलेल्या संरक्षक भिंतीमुळे नाहक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. शौचालय असूनही नियोजनशून्य काराभारामुळे आजअखेर त्याला कुलूप आहे. त्यामुळे प्रवाशांची अडचण होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तातडीने उर्वरित काम पूर्ण करून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)पाससाठी विद्यार्थी ताटकळत...वडूज बसस्थानक, आगारासाठी या शहरातील दात्यांनी कवडी मोल किमतींनी आपल्या जमिनी दिल्या. त्या शुद्ध हेतूने, काहीतरी चांगले होत आहे म्हणून. परंतु संबंधित प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गेली अनेक वर्षं झाली तरी पिण्याच्या पाण्याची ओरड, शौचालयांचा अभाव, स्वच्छतेची ओरड त्याचबरोबरीने एस. टी. पाससाठी असणाऱ्या खिडकीलगत विद्यार्थ्यांचे होणारे हाल. या सर्व बाबींकडे लक्ष वेधले असता तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या वडूज आगाराने याच कामात वाढीव निधीची मागणी करून या सर्व प्रमुख समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना उन्हाच्या काळात एस. टी. पास काढण्यासाठी खिडकीजवळ सुमारे चार-पाच तास ताटकळत उभे राहावे लागते.