शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कोयना खोऱ्यातील गावे सुविधांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:26 IST

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना खोऱ्यातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळन, मोबाइल नेटवर्क, विजेची दुरवस्था, आरोग्य ...

पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील कोयना खोऱ्यातील अनेक गावे आजही सुविधांपासून वंचित आहेत. दळणवळन, मोबाइल नेटवर्क, विजेची दुरवस्था, आरोग्य व्यवस्था या सुविधांची वणवा आजही जाणवत असल्याने, येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने आम्हाला आता तरी नागरी सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी आर्त हाक येथील ग्रामस्थ देऊ लागले आहेत.

महाबळेश्वर तालुक्यातील कोयनेचा बॅकवॉटर परिसरात वसलेली गावे महाबळेश्वरपासून तीस ते चाळीस किलोमीटरवर आहेत. पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडित होणे, मोबाइल नेटवर्क आदी समस्यांमुळे मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचा खेळ सुरू आहे. महाबळेश्वर तालुका हा पर्यटनस्थळदृष्ट्या निसर्ग संपन्न आहे. मात्र, कोयना धरणाच्या शेवटच्या टोकावर वसलेली दाभे मोहन, दाभे, दाभेकर, शिरनार, खरोशी ही गावे मात्र, आजही सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. या गावांमधील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. मोबाइल नेटवर्क नसल्याने मुलांना ऑनलाइन शिक्षण घेता नाही. शिक्षणाची कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यात आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने, कोरोना काळात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला रुग्णालयात नेताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. आम्ही असंच जगायचं का, आम्हाला मूलभूत सुविधा कधी मिळणार, अशी आर्त हाक येथील ग्रामस्थ देऊ लागले आहे.

(कोट)

कोयना जलाशयाच्या काठावर आमची गावे वसली आहेत. पावसाळ्यात आम्हाला खूपच समस्यांचा सामना करावा लागतो. शासनाने आमच्या अडचणी समजून घेऊन दळणवळण, मोबाइल नेटवर्क, वीज, आरोग्य सुविधा यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडवावे, एवढीत अपेक्षा आहे.

- शैलेश शिंदे, सरपंच, दाभेमोहन