शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सातारा जिल्ह्यात वळवाचा साडेआठ हजार शेतकऱ्यांना फटका, पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 17:30 IST

१९८३ घरांनाही पावसाचा दणका

सातारा : जिल्ह्यात मागील मे महिन्याच्या उत्तरार्धात वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे, तसेच वळवाचा ८ हजार ४६६ शेतकऱ्यांनाही फटका बसला असून, २ हजार ४८४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. १ हजार ९८३ घरांनाही पावसामुळे दणका बसला आहे. तरीही अजून पंचनामे सुरू असल्याने नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १८ मे नंतर वळवाचा पाऊस सुरू झाला. वाऱ्याबरोबरच धो-धो पाऊस पडत होता. सलग ७ दिवस कोसळधारा सुरू होत्या. त्यातच तब्बल ५० महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली. यामुळे शेती, पिके, घरे, गोठ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.तरीही आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २ हजार ४८४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. कांदा, बाजरी, टोमॅटो, भुईमूग, भाजीपाला, ढोबळी मिरची आदी पिकांना फटका बसला आहे. यामध्ये ७ हजार ६६१ शेतकरी बाधित झाले आहेत. या शेतकऱ्यांना भरपाईपोटी २ कोटी ३४ लाख रुपये लागण्याचा अंदाज आहे, तसेच पावसात ८०५ शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले आहे. १६९ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. यासाठी ११ लाख ७२ हजार रुपयांची मदत अपेक्षित आहे.

पाऊस काळात दोघांचा मृत्यू..जिल्ह्यातील पाऊस काळात दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. माण तालुक्यात नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात पडल्याने बुडून एकाचा मृत्यू झाला आहे, तर खटाव तालुक्यात विजेचा धक्का बसल्याने एक जण मृत झाला आहे.

२९ गोठे पडले..संपूर्ण जिल्ह्यात वळवाचा पाऊस पडला. यामध्ये सर्वच ११ तालुक्यांत घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झालेले आहे. अंशत: पडझड झालेल्या घरांची संख्या १ हजार ९६९ आहे, तर १४ घरे पूर्णपणे पडलेली आहेत, तर जनावरांचे २९ गोठे बाधित झाले आहेत. यासाठी १ कोटी २ लाख ६१ हजारांचा निधी मदतीसाठी लागण्याचा अंदाज आहे.

५५ जनावरांचा मृत्यू..वळीव पावसाचा शेतकऱ्यांनाच अधिक करून फटका बसला आहे. पिकांचे नुकसान झाले, तसेच जमीनही वाहून जाण्याचा प्रकार घडला आहे. गोठेही पडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील तीन तालुक्यांत लहान ३७ आणि मोठी १८ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच झाले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसfarmingशेतीFarmerशेतकरी