शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

बारामतीची चाकरी करणाºयांचा सत्कार हे दुर्दैव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:23 PM

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके ...

लोकमत न्यूज नेटवर्कखटाव : ‘माण-खटावच्या स्वाभिमानासाठी आजपर्यंत प्रत्येक आघाडीवर लढत आलो आहे. पाण्याची लढाई तर प्राणपणाने लढलो. शरद पवारांसह अनेक बड्या नेत्यांनी जनतेला फसविले. रामराजे तर पृथ्वीच्या अंतापर्यंत माणला पाणी मिळणार नाही, असे सांगायचे. त्यांच्यामुळेच माण-खटावच्या पाणी योजनांची परवड झाली. आपल्याला पाण्यापासून वंचित ठेवून फक्त बारामतीकरांची चाकरी करणाºया रामराजेंचा फटाके फोडून माणमधे सत्कार होतो, हे मोठे दुर्दैव आहे,’ असा घणाघात आमदार जयकुमार गोरे यांनी केला.नरवणे, ता. माण येथे उरमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, तालुकाध्यक्ष अर्जुनतात्या काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, माजी सभापती अतुल जाधव, सिध्दार्थ गुंडगे, विजय धट, नितीन दोशी, सुरेश म्हेत्रे, रामभाऊ देवकर, अकील काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार गोरे पुढे म्हणाले, ‘पाण्याचे राजकारण करून आजपर्यंत अनेकांनी माण-खटावच्या जनतेच्या भावनांशी खेळ केला. मी राजकारणात येताना दिलेला शब्द पूर्ण करत गेल्या चार वर्षांपासून उरमोडीचे पाणी दोन्ही तालुक्यात आणून दुष्काळी जनतेची सेवा करत आहे. माण-खटावच्या मातीची तहान भागवताना, इथल्या शिवारातून कॅनॉलचे पाणी वाहताना आणि ऊसासह बागायती शेती फुलताना समाधान होत आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून माण आणि खटाव या दुष्काळी तालुक्यातील जनता पाण्यासाठी टाहो फोडत आहे. आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधींनी या दोन्ही तालुक्यात पाण्याचे फक्त राजकारण केले. इथल्या जनतेला आश्वासनांवर झुलवत ठेवत राजकीय स्वार्थ साधला. जनतेला जगूही दिले नाही आणि मरूही दिले नाही. युद्ध फक्त घोषणा करून जिंकता येत नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून लढाई लढावी लागते. दुदैर्वाने पाण्यासाठी अशी लढाई कुणी लढलीच नाही.’मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उरमोडीचे विजबिल भरण्यासाठी सरकारला भाग पाडले. उरमोडीचे पाणी माणमधील गोंदवले, किरकसाल, पळशी, म्हसवड, देवापूर, वाकी अशा अनेक गावांमधे नेले आहे. आता हे पाणी नरवणे भागात आले आहे. पुढे वडजलमधे पाणी न्यायचे आहे. ढाकणी तलावातही पाणी सोडायचे आहे. पुढच्या वर्षी उरमोडीचे पाणी जांभुळणीच्या तलावात नेण्याची व्यवस्था करणार आहे.‘शेतकºयांनी या पाण्याचे महत्त्व जाणून ते जपून वापरावे. शेतात अधिकाधिक ठिबकसिंचन करावे.’ असेही गोरे शेवटी म्हणाले.यावेळी कॉँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, उरमोडीचे वाहणारे पाणी पाहून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.लढाई सुरूच राहणार...माण-खटावमधील जनतेने आजपर्यंत खूप संघर्ष केला आहे. आहे त्यात समाधान मानून आपण जगतो. प्रतिकूल परिस्थितीशी लढताना इथली जनता सोशीक बनली आहे. आता मात्र दिलेला शब्द पाळत मी इथल्या काळ्या आईचे ऋण फेडत आहे. यापुढेही निवडणुका होतील, आरोप-प्रत्यारोप होतील. मात्र, माझी पाण्याची लढाई सुरूच राहील.पालकमंत्री बोलघेवडेआमदार गोरे म्हणाले, ‘पालकमंत्री मात्र फक्त बोलघेवडे आहेत. ते एका वर्षात जिहेकटापूर उपसासिंचन योजना पूर्ण करणार होते. पहिल्या वर्षी त्या योजनेला फक्त ७० हजारांचा निधी देणाºयांना आघाडीच्या काळात जिहेकटापूरसाठी मंजूर झालेले १२५ कोटी अद्याप खर्च करता आले नाहीत. आघाडीचे सरकार असते तर जिहेकटापूर योजना मार्गी लावली असती.जयकुमार गोरे उवाचराज्यात सरकार कुणाचेही असो माणमधे फक्त जयकुमारचेच सरकारआजपर्यंत आणि आत्ताही पाणी या फकड्यानेच आणले आहे. आता बारसे घालायला कुणीही यावे.उरमोडीचे पाणी लवकरच ढाकणी तलावात सोडणारमाण तालुक्याच्या शेवटच्या टोकाला पाणी पोहचेपर्यंत संघर्ष सुरूच रहाणार