शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी पूर्ववत करा, अन्यथा आंदोलन छेडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

औंध : महावितरणकडून औंधसह परिसरातील गावातील शेतीपंपाची वीजबिल भरली गेली नसल्याने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे रयत ...

औंध : महावितरणकडून औंधसह परिसरातील गावातील शेतीपंपाची वीजबिल भरली गेली नसल्याने वीज तोडणी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे रयत क्रांती संघटना व शेतकरी यांनी एकत्रितपणे महावितरणला निवेदन दिले असून, वीजजोडणी पूर्ववत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

औंध भागात महावितरणने वीज तोडणीची मोहीम हाती घेऊन शेतीची वीज ट्रान्सफॉर्मरवरूनच कट करण्याची यंत्रणा राबविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सागर जगदाळे व औंध, गोपूज, जायगाव, खबालवाडीसह भागातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महावितरणचे अधिकारी सुभाष घाटोळ यांना निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देणे, ट्रान्सफॉर्मर बंद करणे, एकच तास वीज देणे, वसुलीसाठी तगादा लावणे, या गोष्टी महावितरणने तत्काळ थांबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल अजून वेळेत दिले नाही. अतिवृष्टी, लॉकडाऊन यामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत तसेच किमान तीन महिन्यांचे घरगुती बिल माफ करावे आणि तोडलेले वीज कनेक्शन तातडीने जोडावे, दरम्यान याबरोबरच विनामीटर जोडणी आहे. त्याठिकाणी खरा अधिभार तपासून बिले देण्यात यावी. मीटरचे रीडिंग जागेवर तपासून बिले दुरुस्त करून द्यावी, बंद मीटरची सरासरी काढून बिल आकारणी करावी, थकीत बिलावरील संपूर्ण व्याज व दंडाची रक्कम विनाअट रद्द करावी तसेच वीजबिल वसुलीसाठी साखर कारखाने, ग्रामपंचायत, पतसंस्था, सोसायटी यांना देण्याची योजना राबवू नये, अशा प्रमुख मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.