शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा जिल्ह्यात आयटी पार्क, टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारणी; उदयनराजेंकडून संकल्पनामा जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 12:27 IST

निर्धारित संकल्प पूर्णत्वाची ग्वाही

सातारा : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातील पोवई नाक्यावर संकल्पनामा जाहीर केला. यामध्ये सातारा, कऱ्हाड आणि वाई येथे आयटी पार्क उभारणे, टेक्नाॅलाॅजी सेंटर सुरू करणे आदींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच उदयनराजे यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार संकल्पनामा तयार केला आहे. जिल्ह्यातील निर्धारित संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे, अशी ग्वाहीही दिलेली आहे.जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. पाणी, वीज, रस्ते अशा सुविधा असूनही मोठे उद्योग फारसे नाहीत. यासाठी केंद्रीय सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग मंत्रालयाकडून साताऱ्यात टेक्नाॅलाॅजी सेंटर उभारण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. लवकरच हे सेंटर आणि त्यायोगे मोठे उद्योग जिल्ह्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच जिल्हा पर्यटनात अग्रेसर राहावा, यासाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. यासाठी अजून काही प्रकल्प विचारधीन आहेत, असेही संकल्पनाम्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्याला निसर्गाचा वरदहस्त लाभलाय. त्यामुळे मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असते. यातून रोजगार निर्माण होणार आहे. यासाठी चित्रीकरण एक उद्योग म्हणून आकाराला येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. कृष्णा नदी माथा ते पायथा स्वच्छता, प्रदूषणमुक्त आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच नर्सिंग, दंतवैद्यक, शेती महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र होण्यासाठी अग्रेसर राहणार, यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने साहित्य कला विद्यालयाची निर्मिती, देशातील पहिले बैलगाडा स्टेडियम सातारा लोकसभा मतदारसंघात करण्यात येणार, जिल्ह्यामधील धरणातील पाणी शेतीला आणि पिण्यासाठी पुरेसे मिळण्यासाठी प्रयत्न करणार, असेही या संकल्पनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले