शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

दोन महिन्यांनीही सत्तर विहिरी तुडुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:04 IST

सचिन मंगरूळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही ...

सचिन मंगरूळे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत.कारखेल ग्रामस्थांनी उभारलेल्या जलसंधारण कामातून व त्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीतून चांगले चित्र दिसत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होत ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान केले. त्यानंतर एकच पाऊस झाला त्यामुळे ४५ दिवसांच्या श्रमाची आणि एक दिवसाच्या पावसाच्या कमालीचे यश कारखेल ग्रामस्थ अनुभवत आहेत.म्हसवडच्या उत्तरेला सोलापूर जिल्ह्यााच्या सीमेवर डोंगराच्या कुशीत १, ५७७ लोकसंख्येचं कारखेल गांव वसलेले आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी झगडत अनेक पिढ्या संपल्या तरी येथील दुष्काळ संपलानाही. ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू झाली. गावाने स्पर्धेत सहभागी होत श्रमदानाला सुरुवात केली. ८ एप्रिलला सुरू झालेलं श्रमदान २२ मेपर्यंत सुरू होतं. सलग ४५ दिवस श्रमदानाच काम करून या लोकांनी गावासाठी एक आगळावेगळा इतिहास रचला. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आणि तिला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी गाव एकवटला, आणि एक वेगळच तुफान आलं.घराघरात फक्त पाणी फाउंडेशनच्या गोष्टी होऊ लागल्या. लोकं पाण्याबाबत जागृत झाली आणि एकमेकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. इतर ठिकाणी स्थायिक झालेली सगळी लोकं गावासाठी पुन्हा एकत्र आली.पाण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यात तेवढ्याच तळमळीने सहभागी झाली. पन्नास दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने डोंगरावरून येणाºया पाण्याची धार सुरूच असल्याने गावातील पाझर तलाव, सत्तर विहिरींमध्ये तुडुंब पाणी आहे.केवळ २२ टक्केच कामस्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन प्रोत्साहन दिलं. यातूनच ४५ दिवस न थकता काम करण्याचं बळ मिळालं. आणि ते कामही तेवढ्याच उत्साहात पूर्ण झालं. हे काम झाले असले तरी गावच्या एकूण क्षेत्रातील २२ टक्के च काम झाले. उर्वरीत भागातील मृदसंधारण व जलसंधारणाचे काम झाल्यास येथील सतत पडणाºया दुष्काळावर मात करता येणार आहे.श्रमदानालामान्यवरांची जोडकोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून सीएसआर फंडातून सहा लाख रुपये, राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी आठ दिवस डिझेलसहीत पोकलेन मशीन दिले. पुणे येथील जैन संघटनेने २८० तास जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. बबन विरकर यांनी दोन बॅरल डिझेल दिले, माळशिरस तालुका कृषी अधिकाºयांनी एक बॅलर डिझेल तर गावातील तीन दानशूर व्यक्तिंनी २७ हजारांची मदत केली. वॉटर कप स्पर्धेत तलाठी यु. व्ही. परदेशी, बी. एम. बोराटे यांनी ग्रामस्थांच्या खांद्याला खांदा लावून श्रमदान केले.खूप काही कामं२४ नालाबांध१७ जुन्या नालाबांधची दुरुस्ती२ तलावांची गळती काढली१७ किलोमीटर डीपसीसीटी२० लुज बोल्डर१६५ हेक्टरवर कंपाटमेंट बंडींगप्रत्येक कुटुंबाला पाच झाडे यामध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, कवट या फळांची झाडे देऊन ती जगवण्यासाठीची हमी घेतली.विद्यार्थ्यांना एक झाड दिले तसेच गावात येणाºया रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले.