शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! सातारा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पेरणी बाकी, पावसाची प्रतीक्षा

By नितीन काळेल | Updated: July 12, 2023 19:02 IST

पावसाची प्रतीक्षा कायम

सातारा : जिल्ह्यात जुलैचा मध्य आलातरी पाऊस कमी असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त ३३ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर अजून जवळपास २ लाख हेक्टरवर पेरणी बाकी आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाहीतर पेरणी १०० टक्के होणारच नाही. यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.जिल्ह्यात उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली. तसेच मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. आज १५ दिवस होऊनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. पश्चिम भागातच पाऊस पडल्याने भात लागण आणि पेरणी काही प्रमाणात झाली. मात्र, पूर्व भाग दुष्काळी असून या तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे.आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या ९५ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. काही भागात पाऊस नाही, तर कोठे अजून वापसा नसल्याने पेरणीला वेग नाही. आतापर्यंतच्या पेरणीत भाताची लागण १२ हजार ४०० हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ५ हजार हेक्टरवर तर मकेची ४ हजार २०० हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ४४ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ६० आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची १५ हजार हेक्टर म्हणजे ५० टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.

बाजरीची ११ टक्के पेरणी...खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी हेच प्रमुख पीक होते. पण, आता सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी बाजरीची ६० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. पण, आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर पेर झाली. याचे प्रमाण फक़्त ११ टक्के आहे. त्यातच बाजरी ही प्रामुख्याने माण तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर घेण्याचा अंदाज होता. त्यानंतर खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यात बाजरी घेण्यात येते. पण, अद्यापही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी यापुढे बाजरी पेरणीचे धाडस करणार नाहीत. त्यामुळे पेरणी ५० टक्क्यांपर्यंत तरी जाणार का याविषयी चिंता आहे.

पाटणमध्येच ६१ टक्के पेरणी...

जिल्ह्यातील खरीप पेरणी ३३ टक्के आहे. यामध्ये पाटण तालुक्यातच ६१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. या तालुक्यात २८ हाजर हेक्टरवर भात लागण आणि पेर आहे. तर सातारा तालुक्यात १३ हजार ४२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीचे प्रमाण ४२ टक्के आहे. कऱ्हाड तालुक्याचे क्षेत्र ३८ हजार ५७७ हेक्टर असून ४३ टक्के पेर आहे. कोरेगाव तालुक्यात ७ हजार ८२६ हेक्टरवर पेरणी असून टक्केवारी ३७ च्या वर आहे.खटाव तालुक्यात जवळपास ४६ हजार हेक्टर क्षेत्र असून १२ टक्केच पेरणी झाली. माण तालुक्यात ३९ हजार ६०६ हेक्टरपैकी साडे नऊ हजार हेक्टरवर बाजरीसह इतर पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्यात ३ हजार ३१० हेक्टरवर, खंडाळ्यात १७ टक्के, वाई तालुक्यात २१ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसFarmerशेतकरी