शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

गावाची तहान भागविणाऱ्या शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ : बँकेचे कर्जही थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:05 AM

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील ...

संजय कदम ।वाठार स्टेशन : इतर गावांची सलग तीन वर्षे तहान भागविणाºया जाधववाडी येथील शेतकºयावरच आत्ताच उपासमारीची वेळ आली आहे. विहिरीचे पाणी गावाची तहान भागवण्यासाठी सलग तीन वर्षांपासून शासकीय अधिकाºयांनी दबाबतंत्र वापरून अधिग्रहण केल्याचा आरोप संबंधित अल्पभूधारक शेतकºयाने केला आहे. त्याचे जिल्हा बँकेतील कर्जही थकले आहे.

जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात जाधववाडी येथील बबन महादेव वाघ या शेतकºयाने म्हटले आहे की, तीन वर्षांत गावाला पाणी दिले. परंतु पाण्याचा मोबदलाही शासनाने दिलेला नाही. यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्जही थकले आहे. त्यामुळे आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. एक तर शासनाने या पाण्याचा मोबदला द्यावा, अन्यथा जिल्हा बँकेचे कर्ज शासनाने माफ करावे.याबाबत माहिती अशी की, जाधववाडी गावात राहणारे बबन वाघ यांना वडिलार्जित दोन एकर विहीर बागायत शेती आहे. याच शेतीवर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांची या शेतीवरील विहीर शासनाने गेल्या तीन वर्षांपासून अधिग्रहण केली आहे.

त्यामुळे त्यांच्या शेतीत कोणतीच पीक निघत नाही. त्यातून ते मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तर शासनानेही या पाण्याचा कोणताही मोबदला त्यांना दिला नसल्याने त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घेतलेले दोन लाखांचे कर्जही थकले आहे. एका बाजूला शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन पुढाकार घेत असताना जाधववाडी गावातील शेतकरी शासनाच्या कारभाराला वैतागून आत्महत्या करण्याच्या भूमिकेत आहेत. एक तर शासनाने तत्काळ तीन वर्षांचा मोबदला द्यावा, अन्यथा बँकेतील कर्ज तरी माफ करावे, अशी मागणी जाधववाडी ग्रामस्थ करत आहेत. 

जाधववाडी येथील संबंधित शेतकºयाचा प्रस्ताव मला मिळाला असून, हा प्रस्ताव कोरेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठविला आहे. तो प्रस्ताव मिळताच संबंधित शेतकºयाला त्याच्या हक्काचे पैसे पैसे मिळतील.- स्मिता पवार, तहसीलदार, कोरेगावगावात इतर लोकांच्या विहिरी असतानाही सलग तीन वर्षांपासून आकासापोटी माझीच विहीर अधिग्रहण करण्यासाठी गावचे ग्रामसेवक, तलाठी व तहसीलदार मला दमदाटी करत आहे.- बबन वाघ,शेतकरी, जाधववाडी.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater shortageपाणीटंचाई