शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

By admin | Updated: February 24, 2017 23:42 IST

भुर्इंज गट : भाजपाच्या मतविभागणीने राष्ट्रवादी सुसाट; उमेदवारीपासून निकालापर्यंतचे ‘लोकमत’चे अचूक अंदाज

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवडभुर्इंज गटातील विजयी उमेदवारीची माळ अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांच्या गळ्यात पडली अन् मकरंद आबांच्या करिष्म्याने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेलेला भुर्इंज गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी गुलदस्त्यात राहिलेल्या या गटाची कमान आमदार मकरंद आबांनी अखेरच्या क्षणी चिंधवलीचा क्रिकेटर व सर्व प्रकारच्या पीचवर विजय मिळवणाऱ्या शिलेदाराकडे दिली अन् नंतर चिंधवलीच्या ज्येष्ठ फळीने व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जो धुरळा उडवला त्याचा अखेर गुलाल अंगावर घेऊनच झाला. दरम्यान, काँग्रेसच्या गटातील उमेदवारीचा शेवटपर्यंत न मिटलेला घोळ, पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व भुर्इंज गट व गणात भाजपाच्या उमेदवारांकडून झालेली मतविभागणी काँग्रेसच्या उमेदवारांना मतपेटीतून उमजली असून, या सर्व बाबींवर मोठे मंथन करण्याची वेळ येथील काँग्रेस नेतृत्वावर आज आलेली आहे. ‘लोकमत’ने निवडणुकीपासूनच भुर्इंज गटाचे व भुर्इंज आणि पाचवड गणाचे अचूक वार्तांकन वाचकांसमोर मांडले. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली संभाव्य उमेदवारांची वर्णी त्या-त्या पक्षाकडून झाली आणि प्रथमच भुर्इंज गटात मोठ्या ताकदीने उतरलेला भाजपाचा उमेदवार गटातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणार हा अंदाजही अचूक ठरला. भाजपाकडून लढणारे शशिकांत दगडे यांनी भुर्इंजमधील काँग्रेसचे हक्काचे मतदान हिसकावून घेतल्याने काँग्रेसकडून करण्यात आलेली मतांची गोळाबेरीज पूर्णपणे फोल ठरली. काँग्रेसच्या प्रकाश धुरगुडे यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांसह स्वत:ला झोकून दिले होते. मात्र, संपूर्ण गटाची भिंगरी करणाऱ्या प्रकाश धुरगुडे यांना अंतिम क्षणी महत्त्वाचे गड आपल्या ताब्यात राखता न आल्याने काँग्रेसच्या हक्काच्या व निर्णायक मतांना सुरुंग लागला अन् गटातील निकालाचे चित्रच बदलून गेले. भुर्इंज गटाबरोबरच वाई तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भुर्इंज गणामधील जबरदस्त लढतीत रजनी भोसले-पाटील यांच्यासाठी सुधीर भोसले-पाटील यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून गड सर केला. त्यामुळे भुर्इंज गणातही अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली. चिंधवलीने दाखवले एकीचे बळ भुर्इंज गटातील यावेळच्या निवडणुकीत चिंधवली गावाने राजकारणात सुद्धा एकी होऊ शकते हे दाखवून दिले. ऐनवेळी चिंधवलीतील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला असतानाही आपल्या गावचा उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार म्हणून लहान-थोरापासून सर्वचजण आपापसातील गट-तट, हेवे-दावे विसरून एकत्र आले. ‘एकीचे बळ मिळते फळ’ या उक्तीला साजेशे काम यावेळी चिंधवलीकरांकडून झाले आहे. यावेळी झालेली एकी लवकरच होणाऱ्या चिंधवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत राहिली तर ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडे म्हणजेच आमदार मकरंद आबांच्या विचारांची झाल्यास नवल वाटणार नाही.