शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

आबांचा झंझावात; काँग्रेसला सुरुंग

By admin | Updated: February 24, 2017 23:42 IST

भुर्इंज गट : भाजपाच्या मतविभागणीने राष्ट्रवादी सुसाट; उमेदवारीपासून निकालापर्यंतचे ‘लोकमत’चे अचूक अंदाज

महेंद्र गायकवाड ल्ल पाचवडभुर्इंज गटातील विजयी उमेदवारीची माळ अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्रकाश चव्हाण यांच्या गळ्यात पडली अन् मकरंद आबांच्या करिष्म्याने मागील निवडणुकीत काँग्रेसच्या ताब्यात गेलेला भुर्इंज गट पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या ताब्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीची उमेदवारी गुलदस्त्यात राहिलेल्या या गटाची कमान आमदार मकरंद आबांनी अखेरच्या क्षणी चिंधवलीचा क्रिकेटर व सर्व प्रकारच्या पीचवर विजय मिळवणाऱ्या शिलेदाराकडे दिली अन् नंतर चिंधवलीच्या ज्येष्ठ फळीने व तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जो धुरळा उडवला त्याचा अखेर गुलाल अंगावर घेऊनच झाला. दरम्यान, काँग्रेसच्या गटातील उमेदवारीचा शेवटपर्यंत न मिटलेला घोळ, पक्षातील कार्यकर्त्यांच्या अंतर्गत गटबाजीचा फटका व भुर्इंज गट व गणात भाजपाच्या उमेदवारांकडून झालेली मतविभागणी काँग्रेसच्या उमेदवारांना मतपेटीतून उमजली असून, या सर्व बाबींवर मोठे मंथन करण्याची वेळ येथील काँग्रेस नेतृत्वावर आज आलेली आहे. ‘लोकमत’ने निवडणुकीपासूनच भुर्इंज गटाचे व भुर्इंज आणि पाचवड गणाचे अचूक वार्तांकन वाचकांसमोर मांडले. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेली संभाव्य उमेदवारांची वर्णी त्या-त्या पक्षाकडून झाली आणि प्रथमच भुर्इंज गटात मोठ्या ताकदीने उतरलेला भाजपाचा उमेदवार गटातील काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजयी उमेदवार ठरवणार हा अंदाजही अचूक ठरला. भाजपाकडून लढणारे शशिकांत दगडे यांनी भुर्इंजमधील काँग्रेसचे हक्काचे मतदान हिसकावून घेतल्याने काँग्रेसकडून करण्यात आलेली मतांची गोळाबेरीज पूर्णपणे फोल ठरली. काँग्रेसच्या प्रकाश धुरगुडे यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांसह स्वत:ला झोकून दिले होते. मात्र, संपूर्ण गटाची भिंगरी करणाऱ्या प्रकाश धुरगुडे यांना अंतिम क्षणी महत्त्वाचे गड आपल्या ताब्यात राखता न आल्याने काँग्रेसच्या हक्काच्या व निर्णायक मतांना सुरुंग लागला अन् गटातील निकालाचे चित्रच बदलून गेले. भुर्इंज गटाबरोबरच वाई तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भुर्इंज गणामधील जबरदस्त लढतीत रजनी भोसले-पाटील यांच्यासाठी सुधीर भोसले-पाटील यांनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून गड सर केला. त्यामुळे भुर्इंज गणातही अखेर राष्ट्रवादीने बाजी मारली. चिंधवलीने दाखवले एकीचे बळ भुर्इंज गटातील यावेळच्या निवडणुकीत चिंधवली गावाने राजकारणात सुद्धा एकी होऊ शकते हे दाखवून दिले. ऐनवेळी चिंधवलीतील काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला असतानाही आपल्या गावचा उमेदवार जिल्हा परिषदेत जाणार म्हणून लहान-थोरापासून सर्वचजण आपापसातील गट-तट, हेवे-दावे विसरून एकत्र आले. ‘एकीचे बळ मिळते फळ’ या उक्तीला साजेशे काम यावेळी चिंधवलीकरांकडून झाले आहे. यावेळी झालेली एकी लवकरच होणाऱ्या चिंधवली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपर्यंत राहिली तर ग्रामपंचायतही राष्ट्रवादीकडे म्हणजेच आमदार मकरंद आबांच्या विचारांची झाल्यास नवल वाटणार नाही.