शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

एकवीस दिवसांत तीन हजार हरकती

By admin | Updated: December 31, 2015 00:20 IST

नागरिकांच्या पालिकेत रांगा : वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांचे होतायत हाल : मुदत वाढविण्याची मागणी

सातारा : करवाढी विरोधात हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांकडून अपील करण्यात येत आहे. गेल्या एकवीस दिवसांत तब्बल तीन हजार हरकती पालिकेत दाखल झाल्या आहेत. नागरिकांची गर्दी वाढत आहे. परंतु पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेमध्ये बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.सातारा नगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी चतुर्थ वार्षिक पाहणी पूर्ण केल्यानंतर डिसेंबर महिन्यात करवाढी विरोधात हरकती नोंदविण्याचे अपील करण्यात आले होते. हरकतींना प्रारंभ झाल्यानंतर डिसेंबरचा महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच हरकती नोंदविण्यासाठी पालिकेत नागरिकांनी तुडूंब गर्दी केली. परंतु वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.दर वर्षी चार वर्षांनी करपट्टीत वाढ करण्यात येते. २०११ नंतर आता करवाढ करण्यात येणार असून, सर्रास ३० टक्के करवाढीचा प्रस्ताव नगररचना विभागाने पाठविला आहे. यावर ही करवाढ अमान्य असल्यास यावर हरकती नोंदविण्यासाठी वसुली विभागाने नागरिकांना नोटीस दिल्या आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी हरकती दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीला नागरिकांची पालिकेत गर्दी कमी होती. गेले पाच दिवस सलग सुट्या असल्यामुळे पालिकेत कोणीच फिरकत नव्हते. परंतु आता सुट्या संपल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी केली. गेल्या एकवीस दिवसांच्या कालावधीत सुमारे तीन हजार हरकती दाखल झाल्या असून, यावर अंतिम निर्णय अपील समिती घेणार आहे. शहरातील अनेक भागामध्ये पालिकेकडून अद्याप नोटीसा गेल्या नाहीत. त्यामुळे अपिलाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चतुर्थ वार्षिक पाहणी झोन तयार करण्यात वसुली विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने या हरकतीमुळे त्यांच्या रोजच्या कामावर आणखीन ताण पडला आहे. त्यातच पालिकेतून ३१ डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या २० हून अधिक असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडणार आहे. यंदाची ३० टक्के दरवाढ कोणालाच मान्य नाही. त्यामुळे जेवढ्या मिळकती आहेत. तेवढ्या हरकती पालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जेवणाचं गाठोड पालिकेत ! गेल्या काही दिवसांपासून हरकती दाखल करण्यासाठी पालिकेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. एक हरकती दाखल करण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत आहे. त्यामुळे रांगेत बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागते. आदल्या दिवशी ज्या लोकांना याचा अनुभव आला. त्या लोकांकडून माहिती घेऊन दुसरे येणारे नागरिक पालिकेत घरातून येताना जेवणाचा डबा घेऊनच येत आहेत. रांगेत उभे राहून भूक लागत आहे. त्यामुळे आधी जेवण नंतर काम, असे नागरिकांचे म्हणणे आहे.कारण काय लिहूअनेकजणांना केवळ घरपट्टी वाढली आहे, याचाच संताप झाला आहे. हरकती अर्जावर काय लिहायचे, हे अनेकांना माहितीही नाही. रांगेत उभ्या राहिलेल्यांना अर्जात काय लिहू असे विचारले जात आहे.