शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
3
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
4
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
5
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
6
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
7
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
8
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
9
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
11
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
12
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
13
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
14
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
15
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
16
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
17
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
18
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
19
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
20
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक

एकवीस दिवसांत तीन हजार हरकती

By admin | Updated: December 31, 2015 00:20 IST

नागरिकांच्या पालिकेत रांगा : वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांचे होतायत हाल : मुदत वाढविण्याची मागणी

सातारा : करवाढी विरोधात हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांकडून अपील करण्यात येत आहे. गेल्या एकवीस दिवसांत तब्बल तीन हजार हरकती पालिकेत दाखल झाल्या आहेत. नागरिकांची गर्दी वाढत आहे. परंतु पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेमध्ये बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.सातारा नगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी चतुर्थ वार्षिक पाहणी पूर्ण केल्यानंतर डिसेंबर महिन्यात करवाढी विरोधात हरकती नोंदविण्याचे अपील करण्यात आले होते. हरकतींना प्रारंभ झाल्यानंतर डिसेंबरचा महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच हरकती नोंदविण्यासाठी पालिकेत नागरिकांनी तुडूंब गर्दी केली. परंतु वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.दर वर्षी चार वर्षांनी करपट्टीत वाढ करण्यात येते. २०११ नंतर आता करवाढ करण्यात येणार असून, सर्रास ३० टक्के करवाढीचा प्रस्ताव नगररचना विभागाने पाठविला आहे. यावर ही करवाढ अमान्य असल्यास यावर हरकती नोंदविण्यासाठी वसुली विभागाने नागरिकांना नोटीस दिल्या आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी हरकती दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीला नागरिकांची पालिकेत गर्दी कमी होती. गेले पाच दिवस सलग सुट्या असल्यामुळे पालिकेत कोणीच फिरकत नव्हते. परंतु आता सुट्या संपल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी केली. गेल्या एकवीस दिवसांच्या कालावधीत सुमारे तीन हजार हरकती दाखल झाल्या असून, यावर अंतिम निर्णय अपील समिती घेणार आहे. शहरातील अनेक भागामध्ये पालिकेकडून अद्याप नोटीसा गेल्या नाहीत. त्यामुळे अपिलाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चतुर्थ वार्षिक पाहणी झोन तयार करण्यात वसुली विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने या हरकतीमुळे त्यांच्या रोजच्या कामावर आणखीन ताण पडला आहे. त्यातच पालिकेतून ३१ डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या २० हून अधिक असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडणार आहे. यंदाची ३० टक्के दरवाढ कोणालाच मान्य नाही. त्यामुळे जेवढ्या मिळकती आहेत. तेवढ्या हरकती पालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जेवणाचं गाठोड पालिकेत ! गेल्या काही दिवसांपासून हरकती दाखल करण्यासाठी पालिकेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. एक हरकती दाखल करण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत आहे. त्यामुळे रांगेत बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागते. आदल्या दिवशी ज्या लोकांना याचा अनुभव आला. त्या लोकांकडून माहिती घेऊन दुसरे येणारे नागरिक पालिकेत घरातून येताना जेवणाचा डबा घेऊनच येत आहेत. रांगेत उभे राहून भूक लागत आहे. त्यामुळे आधी जेवण नंतर काम, असे नागरिकांचे म्हणणे आहे.कारण काय लिहूअनेकजणांना केवळ घरपट्टी वाढली आहे, याचाच संताप झाला आहे. हरकती अर्जावर काय लिहायचे, हे अनेकांना माहितीही नाही. रांगेत उभ्या राहिलेल्यांना अर्जात काय लिहू असे विचारले जात आहे.