शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

एकवीस दिवसांत तीन हजार हरकती

By admin | Updated: December 31, 2015 00:20 IST

नागरिकांच्या पालिकेत रांगा : वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्यामुळे नागरिकांचे होतायत हाल : मुदत वाढविण्याची मागणी

सातारा : करवाढी विरोधात हरकती नोंदविण्यासाठी नागरिकांकडून अपील करण्यात येत आहे. गेल्या एकवीस दिवसांत तब्बल तीन हजार हरकती पालिकेत दाखल झाल्या आहेत. नागरिकांची गर्दी वाढत आहे. परंतु पालिकेत कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे नागरिकांना रांगेमध्ये बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागत आहे.सातारा नगर पालिकेने दोन महिन्यांपूर्वी चतुर्थ वार्षिक पाहणी पूर्ण केल्यानंतर डिसेंबर महिन्यात करवाढी विरोधात हरकती नोंदविण्याचे अपील करण्यात आले होते. हरकतींना प्रारंभ झाल्यानंतर डिसेंबरचा महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच हरकती नोंदविण्यासाठी पालिकेत नागरिकांनी तुडूंब गर्दी केली. परंतु वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने नागरिकांना रांगेमध्ये ताटकळत उभे राहावे लागले.दर वर्षी चार वर्षांनी करपट्टीत वाढ करण्यात येते. २०११ नंतर आता करवाढ करण्यात येणार असून, सर्रास ३० टक्के करवाढीचा प्रस्ताव नगररचना विभागाने पाठविला आहे. यावर ही करवाढ अमान्य असल्यास यावर हरकती नोंदविण्यासाठी वसुली विभागाने नागरिकांना नोटीस दिल्या आहेत. दि. ७ डिसेंबर रोजी हरकती दाखल करण्यास प्रारंभ झाला. मात्र सुरुवातीला नागरिकांची पालिकेत गर्दी कमी होती. गेले पाच दिवस सलग सुट्या असल्यामुळे पालिकेत कोणीच फिरकत नव्हते. परंतु आता सुट्या संपल्याने नागरिकांची प्रचंड गर्दी केली. गेल्या एकवीस दिवसांच्या कालावधीत सुमारे तीन हजार हरकती दाखल झाल्या असून, यावर अंतिम निर्णय अपील समिती घेणार आहे. शहरातील अनेक भागामध्ये पालिकेकडून अद्याप नोटीसा गेल्या नाहीत. त्यामुळे अपिलाची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. चतुर्थ वार्षिक पाहणी झोन तयार करण्यात वसुली विभागाचे कर्मचारी व्यस्त असल्याने या हरकतीमुळे त्यांच्या रोजच्या कामावर आणखीन ताण पडला आहे. त्यातच पालिकेतून ३१ डिसेंबर पूर्वी सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या २० हून अधिक असल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोजा पडणार आहे. यंदाची ३० टक्के दरवाढ कोणालाच मान्य नाही. त्यामुळे जेवढ्या मिळकती आहेत. तेवढ्या हरकती पालिकेत दाखल होण्याची शक्यता आहे. असे वसुली विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जेवणाचं गाठोड पालिकेत ! गेल्या काही दिवसांपासून हरकती दाखल करण्यासाठी पालिकेत नागरिकांची गर्दी वाढत आहे. एक हरकती दाखल करण्यासाठी सुमारे पाच ते दहा मिनिटे वेळ लागत आहे. त्यामुळे रांगेत बराचवेळ ताटकळत उभे राहावे लागते. आदल्या दिवशी ज्या लोकांना याचा अनुभव आला. त्या लोकांकडून माहिती घेऊन दुसरे येणारे नागरिक पालिकेत घरातून येताना जेवणाचा डबा घेऊनच येत आहेत. रांगेत उभे राहून भूक लागत आहे. त्यामुळे आधी जेवण नंतर काम, असे नागरिकांचे म्हणणे आहे.कारण काय लिहूअनेकजणांना केवळ घरपट्टी वाढली आहे, याचाच संताप झाला आहे. हरकती अर्जावर काय लिहायचे, हे अनेकांना माहितीही नाही. रांगेत उभ्या राहिलेल्यांना अर्जात काय लिहू असे विचारले जात आहे.