शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

आग्रा ते राजगड शिवज्योत घेऊन निघाले तीस मावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:41 IST

आदर्की : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातील तीस शिवप्रेमी मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड अशी शिवज्योत ...

आदर्की : छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातील तीस शिवप्रेमी मावळे गरुडझेप मोहिमेअंतर्गत आग्रा ते राजगड अशी शिवज्योत आणणार आहेत. या मोहिमेला मंगळवारी सुरुवात झाली. सुमारे बाराशे किलोमीटरची ही मोहीम असून २९ ऑगस्टला ती पूर्ण होणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा चार राज्यांतील ५८ शहरातून रोज सुमारे १०० ते १२० किलोमीटर धावून ही मोहीम पूर्ण करणार आहेत.

या मोहिमेचे नेतृत्व इतिहास अभ्यासक दुर्गवीर ॲड. मारुती आबा गोळे हे करणार आहेत. औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते आणि मोगलांच्या नजरकैदेतून अत्यंत चाणाक्ष बुद्धीने युक्ती लढवित महाराज गरुडझेप घेऊन राजगडावर सुखरूप पोहोचले.

या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. ही घटना म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली गरुडझेप होती. आजही या ऐतिहासिक घटनेमुळे सकल मराठी तसेच हिंदू जनांच्या मनात प्रेरणेची, शौर्याची आणि धैर्याची लहर दौडते. शेकडो वर्षे पारतंत्र्यात परकियांच्या जोखडाखाली पिचलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र देत हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली होती.

ब्रिटिशांना हद्दपार करण्याचे काम भारतीयांनी १९४७ मध्ये केले. त्यांच्या या संघर्षामागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झुंजार लढ्याची प्रेरणा होती. हीच प्रेरणा जिवंत ठेवत महाराष्ट्रातील तीस मावळे यामध्ये सहभागी झाले आहेत. १७ ऑगस्टला आग्रा येथील लाल किल्ल्यापासून या मोहिमेला सुरुवात झाली. २९ व ३० ऑगस्ट रोजी हे मावळे शिवज्योत घेऊन राजगडावर पोहोचणार आहेत.

प्रतिक्रिया

आग्रा येथून १७ ऑगस्ट रोजी तीस मावळे शिवज्योत घेऊन राजगड येथे दि. २९ रोजी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्राहून सुटकेला ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. याची आठवण म्हणून ही मोहीम राबविली आहे.

आकाश राजेंद्र गोळे

अध्यक्ष, फलटण तालुका सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान

फोटो २२आदर्की

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राहून सुटकेला ३५५ वर्षे होत आहेत. याची आठवण म्हणून आग्राहून ३० मावळे शिवज्योत घेऊन राजगडावर निघाले आहेत.