शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
6
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
7
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
8
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

हे आहेत मृत्यूचे नवे ६२ ‘ब्लॅक स्पॉट’ - पोलिसांनी शोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 00:57 IST

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय? ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे.

ठळक मुद्देआता सावधान : जनतेला केलं सतर्कआता आपली जबाबदारी वाढलीय.. नका घेऊ जीवन संपविण्याचा वेग

दत्ता यादव।सातारा : एखाद्या संसर्गजन्य आजारामुळे जशा पद्धतीने मृत्यू होणाचे प्रमाण वाढते. त्याच पद्धतीने आता अलीकडे अपघातामध्येही बळी जाण्याचे प्रमाण वाढतेय. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अनेकांचे संसार अक्षरश: उघड्यावर पडत आहेत. यामुळे आता अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले असून, या ठिकाणी प्रशासन उपाययोजना करेलच; परंतु आता नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे.

एखादी व्यक्ती अपघातामध्ये मृत्यू झाली तर हे नित्याचेच आहे. (नशिबात होतं) असं समजून आपण त्याकडे कानाडोळा करतो. इतकी नागरिकांची संवेदना आता बोथट होऊ लागली आहे. दोन्ही घटनांमध्येही व्यक्तीचा मृत्यूच झालेला असतो. मात्र, अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. जेवढ्या खुनामध्ये व्यक्ती मृत्यू झाल्या आहेत. त्यापेक्षा अपघातामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. कुणाचा भाऊ तर कुणाचा पती, वडील आई असे नातलग अपघातात मरण पावत आहेत. हे कुठंतरी थांबायला हवं. यासाठी आता पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गावरील सातत्याने अपघात होत असलेले ६२ ब्लॅक स्पॉट शोधून काढले आहेत. यावर पोलिसांनी अहवाल तयार केला असून, हा अहवाल महामार्ग प्राधिकरण, जिल्हाधिकारी, विभागाला सादर केला आहे.

येत्या काही दिवसांत या ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना नक्कीच होतील, अशा अपेक्षा करू या. मात्र, नागरिकांनीही आपल्या जीवाची काळजी घेतली पाहिजे. केवळ यंत्रणेवर बोट दाखवून गेलेला जीव परत येणार नाही. त्यामुळे सतर्कता हाच सुरक्षित प्रवासाचा मूलमंत्र आहे.

ब्लॅक स्पॉट म्हणजे काय?ब्लॅक स्पॉटला वारंवार तीन वर्षांमध्ये एकाच ठिकाणी झालेल्या अपघातांना ब्लॅक स्पॉट असे संबोधले जातेय. एका ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असेल तर ते ठिकाण ब्लॅक स्पॉट म्हणून समोर येत आहे.

ही आहेत ब्लॅक स्पॉटशिंदेवाडी शिरवळ, शेंद्रे कारखाना, पेरले फाटा, उंब्रज, कोर्टी फाटा, मलकापूर फाटा, नारायणवाडी फाटा पाचवड, वाठार फाटा हॉटेल वैष्णवी कºहाड अशी जिल्ह्यात महामार्गावर ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.काय उपाययोजना हव्या..फलक, बॅरिकेट्स, रबलिंग स्ट्रीप, वळण काढून टाकणे, झाडांच्या फांद्या काढणे यासह अन्य काही महत्त्वाच्या उपाययोजना जिल्हा वाहतूक शाखेच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या चार महिन्यांपासून जिल्हा वाहतूक शाखेचे कर्मचाऱ्यांनी स्वत: ब्लॅक स्पॉट अपघाताच्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली.

 

शासकीय यंत्रणांनी ब्लॅक स्पॉटवर उपयायोजना केल्या आहेतच. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अनेक दुर्देवी घटना टळू शकतात.- संदीप भागवत, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू