शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ना प्रदूषण होणार ना उमाळे मुजणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता ...

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता हळूहळू बदलत असून, लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. पर्यावरणाला वाचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे दिसून येत आहे. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकडे लोकांचा कल वाढलाय. ‘ना आम्ही प्रदूषण करणार ना आम्ही उमाळे मुजवणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार’ असा निर्धार अनेकांनी केल्याचे दिसत आहे.

गणेशमूर्तींचे भक्तिभावाने दहा दिवसांनंतर विसर्जन केले जाते. आपल्या आजूबाजूला असलेले पाण्याचे स्रोत पाहून त्या ठिकाणी आपण गणेशमूर्तींचे विसर्जन करतो. पूर्वपर चालत आलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सध्याच्या तरुणाईकडून यात थोडा बदल होऊ लागलाय. सध्याच्या तरुणाईला पर्यावरण वाचले पाहिजे हे मनापासून वाटते. नुसते वाटतच नाही तर ही तरुणाई लागलीच कृतीही करून दाखवतेय. दरवर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलाशय, विहीर, तलाव प्रदूषित होत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जाताहेत, तसेच कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना प्रोत्साहित करून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे सांगितले जातेय. त्या दृष्टीने अनेकांनी पावलेही उचलली आहेत. पहिल्या आणि पाचव्या दिवशी शहरात अनेकांनी घरच्या घरीच बादलीमध्ये पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन केले. ना गणेशभक्तांना मिरवणूक काढावी लागली ना तलावावर गर्दी करावी लागली. अत्यंत साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक विसर्जन अनेकांनी केले. भविष्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत आणखी जनजागृती होऊन घरगुती विसर्जनाकडे लोक वळतील, अशी यानिमित्ताने आपण अपेक्षा करूयात.

फोटो :