शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
5
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
6
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
7
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
8
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
9
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
10
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
12
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
13
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
14
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
15
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
16
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
17
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
18
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
19
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
20
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...

ना प्रदूषण होणार ना उमाळे मुजणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता ...

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता हळूहळू बदलत असून, लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. पर्यावरणाला वाचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे दिसून येत आहे. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकडे लोकांचा कल वाढलाय. ‘ना आम्ही प्रदूषण करणार ना आम्ही उमाळे मुजवणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार’ असा निर्धार अनेकांनी केल्याचे दिसत आहे.

गणेशमूर्तींचे भक्तिभावाने दहा दिवसांनंतर विसर्जन केले जाते. आपल्या आजूबाजूला असलेले पाण्याचे स्रोत पाहून त्या ठिकाणी आपण गणेशमूर्तींचे विसर्जन करतो. पूर्वपर चालत आलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सध्याच्या तरुणाईकडून यात थोडा बदल होऊ लागलाय. सध्याच्या तरुणाईला पर्यावरण वाचले पाहिजे हे मनापासून वाटते. नुसते वाटतच नाही तर ही तरुणाई लागलीच कृतीही करून दाखवतेय. दरवर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलाशय, विहीर, तलाव प्रदूषित होत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जाताहेत, तसेच कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना प्रोत्साहित करून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे सांगितले जातेय. त्या दृष्टीने अनेकांनी पावलेही उचलली आहेत. पहिल्या आणि पाचव्या दिवशी शहरात अनेकांनी घरच्या घरीच बादलीमध्ये पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन केले. ना गणेशभक्तांना मिरवणूक काढावी लागली ना तलावावर गर्दी करावी लागली. अत्यंत साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक विसर्जन अनेकांनी केले. भविष्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत आणखी जनजागृती होऊन घरगुती विसर्जनाकडे लोक वळतील, अशी यानिमित्ताने आपण अपेक्षा करूयात.

फोटो :