शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

ना प्रदूषण होणार ना उमाळे मुजणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:38 IST

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता ...

सातारा : फार पूर्वीपासून गणेशमूर्तींचे विसर्जन हे विहिरी, जलाशय, तलाव या ठिकाणी केले जाते होते. मात्र, सध्याची परिस्थिती आता हळूहळू बदलत असून, लोकांमध्ये जनजागृती होऊ लागली आहे. पर्यावरणाला वाचविण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे दिसून येत आहे. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याकडे लोकांचा कल वाढलाय. ‘ना आम्ही प्रदूषण करणार ना आम्ही उमाळे मुजवणार..काही करून आम्ही घरीच विसर्जन करणार’ असा निर्धार अनेकांनी केल्याचे दिसत आहे.

गणेशमूर्तींचे भक्तिभावाने दहा दिवसांनंतर विसर्जन केले जाते. आपल्या आजूबाजूला असलेले पाण्याचे स्रोत पाहून त्या ठिकाणी आपण गणेशमूर्तींचे विसर्जन करतो. पूर्वपर चालत आलेली ही परंपरा आजही अखंडितपणे सुरूच आहे. मात्र, सध्याच्या तरुणाईकडून यात थोडा बदल होऊ लागलाय. सध्याच्या तरुणाईला पर्यावरण वाचले पाहिजे हे मनापासून वाटते. नुसते वाटतच नाही तर ही तरुणाई लागलीच कृतीही करून दाखवतेय. दरवर्षी गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलाशय, विहीर, तलाव प्रदूषित होत आहेत. इतकेच नव्हे, तर त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जाताहेत, तसेच कालांतराने तो जलाशय निरुपयोगी ठरतो. त्यामुळे अनेकांनी एकमेकांना प्रोत्साहित करून घरच्या घरी गणेशमूर्तींचे विसर्जन करा, असे सांगितले जातेय. त्या दृष्टीने अनेकांनी पावलेही उचलली आहेत. पहिल्या आणि पाचव्या दिवशी शहरात अनेकांनी घरच्या घरीच बादलीमध्ये पाणी घेऊन मूर्तीचे विसर्जन केले. ना गणेशभक्तांना मिरवणूक काढावी लागली ना तलावावर गर्दी करावी लागली. अत्यंत साध्या पद्धतीने पर्यावरणपूरक विसर्जन अनेकांनी केले. भविष्यात गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत आणखी जनजागृती होऊन घरगुती विसर्जनाकडे लोक वळतील, अशी यानिमित्ताने आपण अपेक्षा करूयात.

फोटो :