शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

खटाव तालुक्यात जमीन-विक्री परवानगीचा एकही दस्त नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

रशिद शेख औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या ...

रशिद शेख

औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या आदेशानुसार जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र-खटाव तालुक्यात आजअखेर एकही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय ते प्रांत कार्यालय आणि तेथून पुन्हा निबंधक कार्यालय असा प्रवास करून सर्वसामान्य जनतेची दमछाक झाली आहे.

ग्रामीण भागात तंटे आणि वादविवाद निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने जिरायत, बागायत जमीन खरेदीसाठी नवे नियम लागू करून एक महिना उलटून गेला तरीही परवानगी कुठून घ्यायची, किती दिवसात मिळणार, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. ग्रामीण भागात शक्यतो विहिरीसाठी गुंठेवारी सोडली, तर शेतजमिनीचे व्यवहार २० गुंठे म्हणजे अर्ध्या एकराच्या पुढेच एक-दोन-पाच एकर असे होत असतात. मात्र, जिरायत जमीन दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्री आधी परवानगीची गरज लागणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन २० गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे.

त्यामुळे व्यवहारातील गुप्तता पाळण्यासाठी आणि जलद व्यवहार होण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही.

एक महिना झाला, तरी अजून कोणी परवानगी आणून दस्त केला आहे, अशी एकही घटना नाही. परवानगी काढण्यासाठी गेलेल्या लोकांना संबंधित कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत असले, तरी या जमीन विक्री परवानगीचा तसा आमचा संबंध येत नसल्याचे काही कनिष्ठ अधिकारी गेलेल्या लोकांना खासगीत सांगत आहेत, तर शासनाने काढलेले परिपत्रक आहे, त्यामुळे परवानगी आवश्यक आहे, असे दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

चौकट:-

दोन अंकीवरून एक अंकीवर..

सर्व कार्यालयांपेक्षा दुय्यम निबंधक कार्यालय नेहमी गजबजलेल्या अवस्थेत असते; मात्र गेली एक महिना वीस ते तीस प्रतिदिन होणारे दस्त आता पाच-सात असे होऊ लागले आहेत. ही संख्या आता दोन अंकीवरून एक अंकीवर येऊन ठेपली आहे. परिणामी शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागला आहे.

कोट...१

दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व या निर्णयात शिथिलता आणण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. हजारो प्रश्न लोकांसमोर पडले आहेत, ते शासनाने सोडवावेत. लोकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी अशी नियमावली काढून लोकांना अडचणीत आणण्याचे उद्योग या शासनाकडून होत आहेत.

- आ. जयकुमार गोरे माण-खटाव विधानसभा

कोट..२

या निर्णयामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. दवाखाना, लग्न, विहिरी, पाईपलाईन व अन्य गरजांसाठी विक्री करणारे शेतकरी हतबल होऊन पुन्हा सावकारांच्या टक्केवारीच्या जाळ्यात ओढले जाऊ लागले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे बनले आहे.

- अनिल पवार, राज्यप्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना