शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

खटाव तालुक्यात जमीन-विक्री परवानगीचा एकही दस्त नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

रशिद शेख औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या ...

रशिद शेख

औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या आदेशानुसार जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र-खटाव तालुक्यात आजअखेर एकही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय ते प्रांत कार्यालय आणि तेथून पुन्हा निबंधक कार्यालय असा प्रवास करून सर्वसामान्य जनतेची दमछाक झाली आहे.

ग्रामीण भागात तंटे आणि वादविवाद निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने जिरायत, बागायत जमीन खरेदीसाठी नवे नियम लागू करून एक महिना उलटून गेला तरीही परवानगी कुठून घ्यायची, किती दिवसात मिळणार, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. ग्रामीण भागात शक्यतो विहिरीसाठी गुंठेवारी सोडली, तर शेतजमिनीचे व्यवहार २० गुंठे म्हणजे अर्ध्या एकराच्या पुढेच एक-दोन-पाच एकर असे होत असतात. मात्र, जिरायत जमीन दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्री आधी परवानगीची गरज लागणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन २० गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे.

त्यामुळे व्यवहारातील गुप्तता पाळण्यासाठी आणि जलद व्यवहार होण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही.

एक महिना झाला, तरी अजून कोणी परवानगी आणून दस्त केला आहे, अशी एकही घटना नाही. परवानगी काढण्यासाठी गेलेल्या लोकांना संबंधित कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत असले, तरी या जमीन विक्री परवानगीचा तसा आमचा संबंध येत नसल्याचे काही कनिष्ठ अधिकारी गेलेल्या लोकांना खासगीत सांगत आहेत, तर शासनाने काढलेले परिपत्रक आहे, त्यामुळे परवानगी आवश्यक आहे, असे दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

चौकट:-

दोन अंकीवरून एक अंकीवर..

सर्व कार्यालयांपेक्षा दुय्यम निबंधक कार्यालय नेहमी गजबजलेल्या अवस्थेत असते; मात्र गेली एक महिना वीस ते तीस प्रतिदिन होणारे दस्त आता पाच-सात असे होऊ लागले आहेत. ही संख्या आता दोन अंकीवरून एक अंकीवर येऊन ठेपली आहे. परिणामी शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागला आहे.

कोट...१

दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व या निर्णयात शिथिलता आणण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. हजारो प्रश्न लोकांसमोर पडले आहेत, ते शासनाने सोडवावेत. लोकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी अशी नियमावली काढून लोकांना अडचणीत आणण्याचे उद्योग या शासनाकडून होत आहेत.

- आ. जयकुमार गोरे माण-खटाव विधानसभा

कोट..२

या निर्णयामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. दवाखाना, लग्न, विहिरी, पाईपलाईन व अन्य गरजांसाठी विक्री करणारे शेतकरी हतबल होऊन पुन्हा सावकारांच्या टक्केवारीच्या जाळ्यात ओढले जाऊ लागले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे बनले आहे.

- अनिल पवार, राज्यप्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना