शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

खटाव तालुक्यात जमीन-विक्री परवानगीचा एकही दस्त नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST

रशिद शेख औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या ...

रशिद शेख

औंध : जमीन खरेदी-विक्रीच्या नव्या आदेशामुळे घेणार आणि देणार यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या आदेशानुसार जमीन खरेदी-विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मात्र-खटाव तालुक्यात आजअखेर एकही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालय ते प्रांत कार्यालय आणि तेथून पुन्हा निबंधक कार्यालय असा प्रवास करून सर्वसामान्य जनतेची दमछाक झाली आहे.

ग्रामीण भागात तंटे आणि वादविवाद निर्माण होऊ नयेत, यासाठी राज्य सरकारने जिरायत, बागायत जमीन खरेदीसाठी नवे नियम लागू करून एक महिना उलटून गेला तरीही परवानगी कुठून घ्यायची, किती दिवसात मिळणार, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. ग्रामीण भागात शक्यतो विहिरीसाठी गुंठेवारी सोडली, तर शेतजमिनीचे व्यवहार २० गुंठे म्हणजे अर्ध्या एकराच्या पुढेच एक-दोन-पाच एकर असे होत असतात. मात्र, जिरायत जमीन दोन एकरापेक्षा कमी क्षेत्र असल्यास खरेदी-विक्री आधी परवानगीची गरज लागणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला बागायती जमीन विकायची असेल आणि खरेदी करायची असेल आणि जमीन २० गुंठ्यापेक्षा कमी असेल, तर खरेदी-विक्रीआधी परवानगीची गरज लागणार आहे.

त्यामुळे व्यवहारातील गुप्तता पाळण्यासाठी आणि जलद व्यवहार होण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उरला नाही.

एक महिना झाला, तरी अजून कोणी परवानगी आणून दस्त केला आहे, अशी एकही घटना नाही. परवानगी काढण्यासाठी गेलेल्या लोकांना संबंधित कार्यालयात योग्य मार्गदर्शन मिळत असले, तरी या जमीन विक्री परवानगीचा तसा आमचा संबंध येत नसल्याचे काही कनिष्ठ अधिकारी गेलेल्या लोकांना खासगीत सांगत आहेत, तर शासनाने काढलेले परिपत्रक आहे, त्यामुळे परवानगी आवश्यक आहे, असे दुय्यम निबंधक कार्यालयातून सांगण्यात येत आहे.

चौकट:-

दोन अंकीवरून एक अंकीवर..

सर्व कार्यालयांपेक्षा दुय्यम निबंधक कार्यालय नेहमी गजबजलेल्या अवस्थेत असते; मात्र गेली एक महिना वीस ते तीस प्रतिदिन होणारे दस्त आता पाच-सात असे होऊ लागले आहेत. ही संख्या आता दोन अंकीवरून एक अंकीवर येऊन ठेपली आहे. परिणामी शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागला आहे.

कोट...१

दुष्काळी भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व या निर्णयात शिथिलता आणण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. हजारो प्रश्न लोकांसमोर पडले आहेत, ते शासनाने सोडवावेत. लोकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी अशी नियमावली काढून लोकांना अडचणीत आणण्याचे उद्योग या शासनाकडून होत आहेत.

- आ. जयकुमार गोरे माण-खटाव विधानसभा

कोट..२

या निर्णयामुळे अनेक गरजू शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. दवाखाना, लग्न, विहिरी, पाईपलाईन व अन्य गरजांसाठी विक्री करणारे शेतकरी हतबल होऊन पुन्हा सावकारांच्या टक्केवारीच्या जाळ्यात ओढले जाऊ लागले आहेत. त्यामुळे शासनाने याबाबत पुनर्विचार करणे गरजेचे बनले आहे.

- अनिल पवार, राज्यप्रवक्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटना