शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

घडतंय बिघडतंय: कऱ्हाडमध्ये भाजप-शिंदेसेनेचा सवता सुभा, स्वबळावर लढण्याची हवी मुभा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 15:54 IST

भाजपची पायी तर शिंदे गटाकडून स्वतंत्र तिरंगा मोटारसायकल रॅली

प्रमोद सुकरे कऱ्हाड : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेणाऱ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ देशभर सगळीकडे तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. कराडातही रविवारी भाजपने तिरंगा रॅली काढली तर मंगळवारी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजेंद्रसिंह यादव यांच्या पुढाकारातून  मोटारसायकल बाईक तिरंगा रॅली काढण्यात आली. यामुळे महायुतीतील घटक पक्षातही तिरंगा रॅलीत सवता सुभा पाहायला मिळत आहे. त्यातून आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वबळावर लढण्याची मुभा हवी असेच संकेत दिले जात आहेत.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्या माध्यमातून मोठे यश प्राप्त केले. म्हणूनच त्या सैनिकांच्या सन्मानार्थ व आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. पण या तिरंगा रॅलीचे आयोजन करताना महायुतीतील घटक पक्षात मात्र एकवाक्यता नसल्याचे समोर येत आहे.

रविवारी कराड शहरात भाजपने ही तिरंगा रॅली काढली. यात कराड दक्षिणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले , कराड उत्तर चे आमदार मनोज घोरपडे व त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पण या रॅलीत राज्यात आणि देशात त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या घटक पक्षातील नेते मात्र कोठेच दिसले नाहीत.तर मंगळवारी शिवसेनेच्या मोटारसायकल बाईक तिरंगा रॅलीला राजेंद्रसिंह यादव, रणजीत पाटील व त्यांचे शिवसैनिक दिसले.

नजीच्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. महायुतीचे नेते या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढण्याच्या भाषा करीत आहेत. मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या ते पचनी पडत नसल्याचे दिसते. भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपले स्वतंत्र अस्तित्व ठेवण्यासाठी धडपडत आहेत.त्याचाच भाग म्हणून तिरंगा रॅलीचे आयोजन एकत्रित न होता स्वतंत्रपणे होताना दिसत आहे.

'राष्ट्रवादी' थंडच ..उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. कराड तालुक्यात त्यांच्या पक्षाची ताकद चांगली आहे. किंबहुना रयत सहकारी साखर कारखाने अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांना पक्षप्रवेश देऊन ती अधिक वाढली आहे. पण तिरंगा रॅली बाबत राष्ट्रवादी अजून थंडच दिसत आहे.

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकारखरंतर राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्याशिवाय पक्षाचे चिन्ह, पक्षाचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचत नाहीत हे राजकीय नेते चांगलेच जाणतात. म्हणून तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावरच लढल्या जाव्यात अशी स्थानिक कार्यकर्त्यांची भावना दिसते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना