शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

Satara: येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला, वाहतूक बनली धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 12:47 IST

बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी कोंडी

विठ्ठल नलवडेकातरखटाव : पाण्याच्या वेगामुळे येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला. यामुळे या पुलावरुन वाहतूक करणे धोकादायक बनले आहे. खटाव तालुक्यातील बनपुरी येथील शेतकऱ्यांना शिवारात जाण्यासाठी कोंडी झाली आहे.अवकाळी पावसाच्या दमदार हजेरीमुळे ओढे, नाले, नदी, येरळा धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. येरळा धरणाच्या सांडव्यातून नदी पात्रात अतिवेगाने पाणी वाहत आहे. पाण्याच्या वेगामुळे नदी पात्रातील पुलावरचा रस्ता खचला आहे. सिमेंटचे कठडे तुटले आहेत. कठडे, मुरूम पाण्याच्या प्रवाहाने वाहुन गेल्याने रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.पुलाची उंची कमी असल्याने पुलावर पाणी आले की बनपुरी-अंबवडे गावचा मार्ग बंद होतो. बनपुरी येथील गावकऱ्यांची शेती नदी पात्राच्या पलीकडे असल्याने पाणी ओसरल्यानंतरच शेतात जावे लागते. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

येरळा धरणाच्या नदी पात्रातील पुलावरुन धोका पत्करून ये-जा करावी लागत आहे. पुलाची बिकट अवस्था झाल्याचे पुलाची उंची वाढवावी हाच एकमेव पर्याय आहे.- दिलीप पाटोळे, शेतकरी बनपुरी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसriverनदीTrafficवाहतूक कोंडी