शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:07 IST

खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते.

बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा (कोअर) क्षेत्रात आणि कोयना धरणाच्या पलीकडील बाजूस असलेल्या खिरखंडी गावातील मुलांना शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून होडी चालवीत शाळेला जावे लागत होते. याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनाने विद्यार्थ्यांची आश्रमशाळेमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली आहे, तर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी उपाययोजन करण्यास सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सहाय्यक बन संरक्षक सुरेश साळुंखे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, राम पवार, विजय देशमुख,अशोक मनुकर, दीपक भुजबळ आदी उपस्थित होते.जावळी तालुक्यात खिरखंडी गाव आहे. या गावामध्ये पूर्वी ७० कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे ठाणे जिल्ह्यातील एकसाल सागाव (ता. भिवंडी) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि पुनर्वसन झाल्यानंतरही ७० पैकी ६ कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही. एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु, या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्य:स्थितीत सात कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता खिरखंडीत वास्तव्यास आहेत.

पालकांचे मन वळविण्यात प्रशासनाला यशखिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना लाँचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थी आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली, या प्रयत्नांना यश आले आहे.

सध्या खिरखंडी ग्रामस्थ येथे खूप वाईट परिस्थितीत राहत असून, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावत आहे. आम्ही त्यांची नजीकच्या आश्रम शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्नही येत्या आठ दिवसांत कायमचा मार्गी लावणार आहे. - रुचेश जयवंशी - जिल्हाधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी