शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील खिरखंडीच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास थांबणार, शिक्षणासाठी होडीतून करावा लागायचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:07 IST

खिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते.

बामणोली : सह्याद्री व्याघ्र प्रकल्प गाभा (कोअर) क्षेत्रात आणि कोयना धरणाच्या पलीकडील बाजूस असलेल्या खिरखंडी गावातील मुलांना शिक्षणासाठी धरणाच्या पाण्यातून होडी चालवीत शाळेला जावे लागत होते. याबाबत उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतल्यानंतर सातारा जिल्हा प्रशासन गावात दाखल झाले. प्रशासनाने विद्यार्थ्यांची आश्रमशाळेमध्ये राहण्याची आणि शिक्षणाची व्यवस्था केली आहे, तर ग्रामस्थांच्या पुनर्वसनाबाबत आठ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी उपाययोजन करण्यास सांगितल्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सहाय्यक बन संरक्षक सुरेश साळुंखे, तहसिलदार राजेंद्र पोळ, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत कर्णे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, राम पवार, विजय देशमुख,अशोक मनुकर, दीपक भुजबळ आदी उपस्थित होते.जावळी तालुक्यात खिरखंडी गाव आहे. या गावामध्ये पूर्वी ७० कुटुंबे वास्तव्यास होती. कोयना धरणाच्या निर्मितीमुळे या गावाचे ठाणे जिल्ह्यातील एकसाल सागाव (ता. भिवंडी) या गावामध्ये पुनर्वसन झाले. तथापि पुनर्वसन झाल्यानंतरही ७० पैकी ६ कुटुंबांनी पुनर्वसन झालेल्या गावातील जमीन ताब्यात घेतली नाही. एका कुटुंबाने पुनर्वसनाच्या ठिकाणची जमीन ताब्यात घेतली आहे. परंतु, या कुटुंबातील काही व्यक्ती खिरखंडी येथेच वास्तव्यास आहेत. सद्य:स्थितीत सात कुटुंबे पुनर्वसन झालेल्या गावांमध्ये स्थलांतरित न होता खिरखंडीत वास्तव्यास आहेत.

पालकांचे मन वळविण्यात प्रशासनाला यशखिरखंडी येथील विद्यार्थ्यांची शिक्षण व राहण्याची सोय अंधारी येथील आश्रमशाळेमध्ये करण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत होते. परंतु, सद्य:स्थितीत या विद्यार्थ्यांचे पालक त्यासाठी सहमत नव्हते. प्रशासनामार्फत या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवृत्त करण्याचे प्रयत्न सुरू होते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना लाँचने अथवा पायी प्रवास करावा लागणार नाही. या प्रयत्नांचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामस्थांशी विद्यार्थी आणि पुनर्वसनाबाबत चर्चा केली, या प्रयत्नांना यश आले आहे.

सध्या खिरखंडी ग्रामस्थ येथे खूप वाईट परिस्थितीत राहत असून, त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावत आहे. आम्ही त्यांची नजीकच्या आश्रम शाळेमध्ये पर्यायी व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर त्यांचा पुनर्वसनाचा प्रश्नही येत्या आठ दिवसांत कायमचा मार्गी लावणार आहे. - रुचेश जयवंशी - जिल्हाधिकारी, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStudentविद्यार्थी