शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

उन्हामुळे सोयाबीन पिकाला फटका, शेतकऱ्यांच्या स्वप्नाला बसला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 16:50 IST

चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते.

नितीन काळेलसातारा : चांगला दर मिळत असल्याने जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात वाढ होत असून, यंदा उन्हाळ्यातही पीक घेण्यात आले होते. मात्र, कडक उन्हामुळे फुलगळ होऊन उत्पादन, तसेच दर्जावरही परिणाम झाला, तर परिपक्व सोयाबीन नसल्याचा फायदा घेत व्यापारीही कमी दराने खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मालामाल होण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हंगाम महत्त्वाचे असतात. यामध्ये खरीप हंगाम सर्वांत मोठा असतो. या हंगामातील ऊस वगळून जिल्ह्यातील सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख हेक्टरवर असते. यामध्ये बाजरीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर राहते, तर सोयाबीन ६३ हजार, भात ४९ हजार, भुईमूग ३८ हजार, ज्वारी २४ हजार, मका १८ हजार आणि नाचणी ६ हजार हेक्टर असे प्रमुख पिकांचे क्षेत्र राहते. आतापर्यंत खरीप हंगामातच सोयाबीनचे पीक घेण्यात येत होते; पण बदलत्या काळात शेतकरी आता वर्षात ‘डबल बार’ उडवून देऊ लागले आहेत.जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीन घेण्यात येते. याचे सर्वसाधारण क्षेत्र ६३ हजार हेक्टर असले तरी त्यामध्ये वाढ होत आली आहे. गेल्या पाच वर्षांत खरीप सोयाबीन क्षेत्रात जवळपास १५ हजार हेक्टरची वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी खरिपात ७४ हजार हेक्टरवर पेरणी झाली, तर खरिपानंतर उन्हाळ्यातही ९ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सोयाबीन पीक घेऊन ‘डबल बार’ उडवून दिला होता. या तालुक्यांत १,७६१ हेक्टरवर पीक होते. यामध्ये माण आणि महाबळेश्वर हे तालुके वगळता इतर सर्व तालुक्यांत सोयाबीन होते. यावर्षी कडक उन्हाळा होता. त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर उत्पादित सोयाबीन लहान राहिल्याने दर्जा राहिला नाही. परिणामी व्यापारी कमी दराने मागत आहेत.सध्या खरिपातील सोयाबीनला ६,५०० पर्यंत क्विंटलला दर मिळत आहे, तर उन्हाळी सोयाबीनची ५,५०० ते ६ हजारांपर्यंत विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तोटा होत आहे, तसेच मोठ्या अपेक्षेने उन्हाळ्यात सोयाबीन घेऊनही कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्साह मावळला आहे.उन्हाळी सोयाबीन क्षेत्र  तालुका क्षेत्र हेक्टरमध्येसातारा                  ४८५जावळी                 २१पाटण                   ३५कऱ्हाड                 २१६कोरेगाव                १३०खटाव                  १५१फलटण                 ३७६खंडाळा                 ८७वाई                     २६०

शेतकऱ्यांनी यावर्षी प्रथमच मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन पीक घेतले होते; पण, कडक उन्हाळ्यामुळे फुलगळ झाली, दर्जावर परिणाम झाला. याचाच गैरफायदा घेत व्यापारी उन्हाळी सोयाबीनला कमी दर देत आहेत. वास्तविक पाहता सोयाबीन तेलाचा दर अजूनही तेजीत आहे. त्यामुळे सोयाबीनला कमी दर मिळणे शेतकऱ्यांचा तोटा आहे. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी