शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

भीषण दुर्घटना... ट्रॅक्टर ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळून ४ महिलांचा बुडून मृत्यू

By दत्ता यादव | Updated: June 24, 2023 21:15 IST

सातारा शहराजवळील घटना; शेतातून परतत असताना दुर्घटना

सातारा : शेतातील काम आटोपल्यानंतर ट्रॅक्टर ट्राॅलीमधून घरी परतत असताना कॅनाॅलमध्ये ट्राॅली कोसळून चार महिलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिलांना वाचविण्यात यश आलं. ही धक्कादायक घटना सातारा शहराजवळील कारंडवाडी येथे शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय ६०), उल्का भरत माने (वय ५५), अरुणा शंकर साळुंखे (वय ५८), सीताबाई निवृत्ती साळुंखे (वय ६५, सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) अशी बुडून मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहराजवळून जाणाऱ्या महामार्गालगत कारंडवाडी हे गाव आहे. या गावातील सात ते आठ महिला शनिवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास अचानक पाऊस आल्याने सर्व महिला ट्रॅक्टरमध्ये बसून घरी यायला निघाल्या. कारंडवाडी-देगाव रस्त्यावरील कॅनाॅलशेजारून ट्रॅक्टर येत असताना वळणावर अचानक ट्रॅक्टरची ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. त्यामुळे वरील चार महिलांचा कॅनाॅलमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दोन महिलांना ट्रॅक्टर चालक व इतरांनी कसेबसे कॅनाॅलमधून बाहेर काढले. यामुळे त्यांचा जीव वाचला. परंतु त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच गावातील चार महिला कॅनाॅलमध्ये बुडाल्याचे समजताच कारंडवाडी गावातील नागरिक, महिला तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिस व नागरिकांनी चारीही महिलांचे मृतदेह कॅनाॅलमधून बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले.

गावावर शोककळा...

कारंडवाडी गावातील चार महिलांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली. मोलमजुरी करणाऱ्या या चार कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्घटनेची गावात वाऱ्यासारखी माहिती पसरली. त्यानंतर गावकरी, नातेवाइकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाइकांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. जो-तो या घटनेबाबत हळहळ व्यक्त करत होता.

असा झाला अपघात..

शनिवारी दुपारी चार वाजता अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कॅनाॅलशेजारून जाणाऱ्या कच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला होता. कॅनाॅलच्या शेजारून ट्रॅक्टर वळण घेत असताना पाठीमागील ट्राॅलीचे चाक अचानक घसरले. त्यामुळे ट्राॅली कॅनाॅलमध्ये कोसळली. यातच चार महिलांना आपला प्राण गमवावा लागला. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरWaterपाणीFarmerशेतकरी