शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला भीषण आग

By admin | Updated: December 16, 2014 23:40 IST

शिरवळ येथील घटना : २० लाखांचे नुकसान; आगीबाबत उलट-सुलट चर्चा

शिरवळ : शिरवळ, (ता. खंडाळा) येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावलेल्या डॉल्बी सिस्टीमच्या टेम्पोला आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला आग लागली की लावण्यात आली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील करन विश्वास कुचेकर यांच्या मालकीची साई डिजीटल-डॉल्बी म्युझिक सिस्टम नावाची डॉल्बी सिस्टीम आहे. सदर डॉल्बी सिस्टीम टाटा टेम्पो (एमएच ०६ के. ४५६१) यावर बसविण्यात आली आहे. काल (सोमवार दि. १५) शिरवळ येथील एक लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून सदरची डॉल्बी सिस्टीम बसस्थाणक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावण्यात आली होती. यावेळी करण कुचेकर यांनी रात्री ८ च्या सुमारास गाडीजवळ येऊन टेम्पो १० मिनिटे सुरू केले. त्यानंतर टेम्पो बंद करुन टेम्पोमधील बॅटरीच्या वायरी बॅटरीपासून दुर केल्या व काचा लावत घरी झोपण्यासाठी गेले. पहाटे तीनच्या सुमारास संबंधीत डॉल्बी सिस्टिमला आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खाजगी टँकरच्या सहाय्याने टेम्पोला लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात नागरिक व पोलीसांना यश आले. मात्र, तोपर्यंत अगीत टेम्पोचे, म्युझिक सिस्टमचे, साऊंड, एम्पलीफायर मशीनचे, एअर कंडिश्नर, जनरेटर, इलेक्ट्रीक साहत्य जळून खाक झाले. आगीत डॉल्बी सिस्टीमचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदान व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टीमला आग लागली की लावण्यात आली? याबाबत साशंकता निर्माण झाली असून याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस दुरक्षेत्रात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार रफिक पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)ग्रामस्थांना अग्निशमन बंबांची प्रतीक्षा...शिरवळ व परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत असताना या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना सतत घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरवळजवळील भंगाराच्या दुकानाला आग लागून लोखोंचे नुकसान झाले होते. तर महामार्गावर ट्रक जळून खाक झाला होता. याठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने प्रशानाकडे अग्निशमन बंबासाठी प्रस्ताव देऊनही याकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रस्ताव कित्येक महिने जिल्हाधिकारी कार्यालयात धुळखात पडला आहे. याठिकाणी लवकरात-लवकर अग्निशमन बंब उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.