शहरं
Join us  
Trending Stories
1
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
2
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
3
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
4
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
5
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
6
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
7
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
8
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
9
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
10
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
11
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
12
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
14
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
15
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
16
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
17
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
18
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
19
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
20
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."

डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला भीषण आग

By admin | Updated: December 16, 2014 23:40 IST

शिरवळ येथील घटना : २० लाखांचे नुकसान; आगीबाबत उलट-सुलट चर्चा

शिरवळ : शिरवळ, (ता. खंडाळा) येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावलेल्या डॉल्बी सिस्टीमच्या टेम्पोला आग लागून सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टिमच्या टेम्पोला आग लागली की लावण्यात आली? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.याबाबतची पोलीसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ येथील करन विश्वास कुचेकर यांच्या मालकीची साई डिजीटल-डॉल्बी म्युझिक सिस्टम नावाची डॉल्बी सिस्टीम आहे. सदर डॉल्बी सिस्टीम टाटा टेम्पो (एमएच ०६ के. ४५६१) यावर बसविण्यात आली आहे. काल (सोमवार दि. १५) शिरवळ येथील एक लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकून सदरची डॉल्बी सिस्टीम बसस्थाणक परिसरातील दत्त मंदिराजवळ लावण्यात आली होती. यावेळी करण कुचेकर यांनी रात्री ८ च्या सुमारास गाडीजवळ येऊन टेम्पो १० मिनिटे सुरू केले. त्यानंतर टेम्पो बंद करुन टेम्पोमधील बॅटरीच्या वायरी बॅटरीपासून दुर केल्या व काचा लावत घरी झोपण्यासाठी गेले. पहाटे तीनच्या सुमारास संबंधीत डॉल्बी सिस्टिमला आग लागल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. यानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ही माहिती मिळताच पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने खाजगी टँकरच्या सहाय्याने टेम्पोला लागलेली आग विजविण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात नागरिक व पोलीसांना यश आले. मात्र, तोपर्यंत अगीत टेम्पोचे, म्युझिक सिस्टमचे, साऊंड, एम्पलीफायर मशीनचे, एअर कंडिश्नर, जनरेटर, इलेक्ट्रीक साहत्य जळून खाक झाले. आगीत डॉल्बी सिस्टीमचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदान व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, डॉल्बी सिस्टीमला आग लागली की लावण्यात आली? याबाबत साशंकता निर्माण झाली असून याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.या घटनेची नोंद शिरवळ पोलीस दुरक्षेत्रात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार रफिक पटेल करीत आहेत. (प्रतिनिधी)ग्रामस्थांना अग्निशमन बंबांची प्रतीक्षा...शिरवळ व परिसरातमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण होत असताना या ठिकाणी आगीसारख्या दुर्घटना सतत घडत आहेत. काही महिन्यांपूर्वी शिरवळजवळील भंगाराच्या दुकानाला आग लागून लोखोंचे नुकसान झाले होते. तर महामार्गावर ट्रक जळून खाक झाला होता. याठिकाणी अग्निशमन बंब नसल्याने मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत आहे. शिरवळ ग्रामपंचायतीने प्रशानाकडे अग्निशमन बंबासाठी प्रस्ताव देऊनही याकडे दुर्लक्ष झाले असून हा प्रस्ताव कित्येक महिने जिल्हाधिकारी कार्यालयात धुळखात पडला आहे. याठिकाणी लवकरात-लवकर अग्निशमन बंब उपलब्ध करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.