शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 12:40 IST

talathi, satara, ruralarea पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.

ठळक मुद्देतलाठी शहरातून पाहतात गावचा कारभार, शेतकऱ्यांची परवड ग्रामीण भागातील सजांकडे अण्णासाहेबांची पाठ

रामापूर : पाटण तालुक्यातील तलाठ्यांची त्यांच्या सजातील उपस्थिती हा चर्चेचा विषय आहे. विभागातील अनेक गावांतील तलाठी नेमणूक असलेल्या गावात न थांबता तालुक्यावरूनच कारभार हाकत असल्याने ग्रामीण भागातील जनतेची परवड होत आहे.शासनाने ग्रामीण भागातील जनता, विद्यार्थ्यांचे हाल व नुकसान टाळण्यासाठी लाखो रुपये खर्च करून तलाठी सज्जे उभे केले. सोयी-सुविधायुक्त कार्यालये बांधण्यात आली. मात्र, बहुतांश तलाठी कार्यालयात बसून कारभार पाहत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या व इतर विविध कामांसाठी तलाठी कार्यालयातून सातबारा, खाते उतारा, विविध प्रकारचे दाखले आदी विविध कागदपत्रे विविध कामांसाठी लागत असतात.

शालेय विद्यार्थ्यांसह, नोकरदारांना विविध पदासाठींच्या भरती प्रक्रियेसाठी जात प्रमाणपत्र, रहिवासी, कुटुंब प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे महत्त्वाची ठरत असतात. मात्र ही कागदपत्रे मिळविण्यासाठी सकाळपासूनच संबंधित शेतकरी, ग्रामस्थ या तलाठ्यांचा शोध घेत असतात.

आज इथे तर उद्या तिथे अशाप्रकारे हे तलाठी घिरट्या मारत असतात. अनेक तलाठी कधी-कधी मोबाईलही बंद ठेवतात. तर त्यांचा कोतवालही ग्रामस्थांना त्याबाबत व्यवस्थित माहिती सांगत नाही. परिणामी तलाठी व कोतवाल यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे.अनेक गावांमध्ये खासगी क्लार्क किंवा गावचा कोतवालच तलाठ्यांची कामे करताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह, विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांसाठी लागणारी स्वाक्षरी व कागदपत्रे घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. विशेष म्हणजे येथे आल्यानंतरही या तलाठ्यांच्या मनमानी कारभाराला त्यांना सामोरे जावे लागते. गत अनेक महिन्यांपासून तालुक्यातील सर्वच तलाठी आपल्या सज्जांचा कारभार तालुक्याच्या ठिकाणावरून हाकत असल्याचे दिसत आहे. या मनमानी कारभारावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे दिसत आहे.- चौकटकार्यालये बनली ह्यशोपीसह्णगावागावांत ज्याठिकाणी तलाठी कार्यालये उभारण्यात आलेली आहेत, त्याठिकाणी हे तलाठी हजर राहत नसल्याने ही कार्यालये शोभेची वस्तू बनू लागली आहेत. विद्यार्थी, शेतकऱ्यांना गावातच कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत व त्यांचे होणारे हाल थांबवावेत. संबंधितांना समज द्यावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे.

टॅग्स :TahasildarतहसीलदारSatara areaसातारा परिसरRural Developmentग्रामीण विकास