शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

सौर कृषिपंपाद्वारे १ हजार १८८ जणांना वीज -: शेतकऱ्यांना शाश्वत वीज पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:39 IST

शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातून २ हजार ४११ अर्ज, वीज जोडणीचे पैसे भरून प्रलंबित असलेल्यांना प्राधान्य

सातारा : शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राज्यभरात राबविण्यात येत आहे. ज्या शेतकºयांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहेत व यापूर्वी कृषिपंपासाठी वीजजोडणी घेतलेली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकºयांना या योजनेत प्राधान्य देण्यात येत आहे. जिल्ह्यातील २ हजार ४११ शेतकºयांनी सौर कृषिपंपासाठी आॅनलाईन अर्ज केले असून, १ हजार १८८ जणांना कोटेशन देण्यात आले आहे.

कृषिपंपांना पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा करण्यासाठी ६३ केव्हीए, १०० केव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र (डीपी) उभारण्यात येतात व त्यावरील लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. परंतु वीजचोरी, इतर तांत्रिक बिघाड, विद्युत अपघात, रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांचा धोका यासारख्या अनेक अडचणी निर्माण होतात. दुर्गम किंवा डोंगराळ भागात वीजयंत्रणेचे जाळे नाही तेथे डिझेल इंधनाचा वापर करून कृषिपंप चालविले जातात. या सर्वांसाठी पर्याय म्हणून दिवसा तसेच अखंडित व शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे ज्यांच्याकडे शाश्वत जलस्त्रोत आहे व सिंचनासाठी पारंपरिक पद्घतीने वीजपुरवठा नाही, अशा शेतकºयांसाठी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. तसेच महावितरणकडे कोटेशनची रक्कम भरून वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकºयांना प्राधान्याने सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकºयांना दिवसा सिंचन करता येणार आहे. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलांचा किंवा डिझेलचा खर्च नसल्याने सौरपंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून उपसा करून पिकांना पाणी देता येणार आहे.योजनेतील लाभार्थी हिस्सामुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतून ३ एचपी सौर कृषिपंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के म्हणजे १६ हजार ५६० रुपये भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये भरावे लागणार आहे. तर ५ एचपी सौर कृषिपंपासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना १० टक्के म्हणजे २४ हजार ७१० रुपये भरावे लागणार आहे. तसेच अनुसूचित जाती / जमाती गटातील लाभार्थ्यांना ५ टक्के म्हणजे १२ हजार ३६६ रुपये भरावे लागणार आहे. हे महाग वाटले तरी वीजबिल येणार नसल्याने पैशांची बचत होणार आहे.

कृषिपंपाच्या पारंपरिक वीजजोडणीसाठी सुमारे ५ हजार ५०० रुपये भरल्यानंतर शेतकºयांना ३ किंवा ५ अश्वशक्ती क्षमतेचे कृषिपंप मिळत होता. तर सौर कृषिपंप योजनेत कृषिपंप, सौर पॅनल, पंप कंट्रोलर, पाईप २ एलईडी बल्ब देण्यात येणार आहे. सौर कृषिपंप २५ वर्षे सेवा देऊ शकतो.या कृषिपंपाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ५ वर्षे तर सौर पॅनलसाठी १० वर्षांचा हमी कालावधी राहणार आहे. या हमी कालावधीत सौर कृषिपंप किंवा सौर पॅनल नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी एजन्सीची राहणार आहे. सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास विमा कंपनीकडून संबंधित लाभार्थ्यांना नुकसान भरपाई मिळेल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwater transportजलवाहतूक