शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सूर्यनारायणाच्या साक्षीनं ‘मॉर्निंग वॉक’

By admin | Updated: August 11, 2015 00:03 IST

अफवा बंद; पण भीती कायम : अंधारात बाहेर पडण्यास घाबरतायत नागरिक--फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

माणिक डोंगरे -मलकापूर  चोरट्यांच्या अफवेने गत महिना ढवळून निघाला. सध्या अफवा बंद झाल्या असल्या तरी चोरट्यांची भीती मात्र कायम आहे. आजही गावाला येणारा पाहुणा किंवा आडरानातील व्यावसायिक नऊच्या आत घरात येत आहेत. शहरात मॉर्निंग वॉकला बाहेर पडणारे भीतीपोटी सूर्यनारायणाच्या साक्षीनेच बाहेर पडत आहेत. जुन-जुलै महिन्यांत कऱ्हाड तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये चोरटे दिसल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरल्या. कापील, काले, धोंडेवाडी, नांदलापूर, आटके यासह परिसरातील विविध गावांमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारही घडले. रानात काम करण्यासाठी गेलेल्या मजुरांना उसात चोरटे दिसल्याचे सांगितले गेले; रात्र गस्त वाढल्या. दिवसा काम व रात्री जागरण करून नागरिक हैराण झाले होते. पाचवड फट्यानजीक चार फिरस्त्यांना चोर समजून युवकांनी बेदम चोप दिला होता. तर रात्रीच्या वेळी आलेल्या पाहुण्यांनाही चोर समजून प्रसाद देण्यात आला.या घटनांमध्ये किती प्रमाणात सत्यता आहे. किती प्रमाणात अफवा आहेत, हे आजतागायत कोणालाही उमगलेले नाही. पाचवड फाटा, धोंडेवाडी फाटा, आटके टप्पा अशा महामार्ग व राज्य मार्गालगतच्या; पण आडरानातील व्यावसायिकांनी तर आठ वाजताच दुकाने बंद करून घर गाठणे सुरू केले आहे. त्याचबरोबर पाहुणा नऊच्या आत घरात पोहोचू लागला आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीनेच उजाडल्यानंतरच मॉर्निंग वॉकला जाणे पसंत करत आहेत. फिरस्त्या विक्रेत्यांना ओळखपत्रे द्यावीतसातारा : चोरीच्या अफवांच्या पार्श्वभूमीवर फिरस्त्या विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले असून, त्यांची उपासमार टाळण्यासाठी पोलिसांनी त्यांना ओळखपत्रे किंवा शिफारसपत्रे द्यावीत, अशी मागणी करणारे निवेदन ‘सिटू’शी संलग्न असलेल्या जिल्हा जनरल वर्कर्स युनियनच्या वतीने पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना सोमवारी देण्यात आले.संबंधित विक्रेत्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय ‘सिटू’ने घेतला असल्याचेही वृत्तात म्हटले होते. ‘सिटू’चे जिल्हाध्यक्ष वसंत नलावडे, कोषाध्यक्ष सलीम आतार आणि फिरस्त्यांच्या प्रतिनिधींनी मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले. संघटनेने प्रत्यक्ष वस्तीत जाऊन खातरजमा केली असून, फिरस्त्यांशी लोक संशयाने वागत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खालावली आहे. पोलिसांनी लक्ष घालून फिरत्या विक्रेत्यांना ओळखपत्रे किंवा त्यांचे फोटो असलेले पत्र द्यावे, तसेच त्यांच्या अडवणुकीविषयी कार्यवाही करावी, असे पत्रात म्हटले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. मजुरांचा तुटवडाकापील-गोळेश्वर, जखिणवाडी, मलकापूर, काले या शहरालगतच्या गावांतील शेतकरी ऊस उत्पादनाऐवजी पालेभाज्या व फळभाज्यांची पिके घेण्याकडे वळला आहे. या पिकांचे संगोपन व काढणी वेळेत होणे गरजेचे असते. चोरट्यांच्या अफवेमुळे महिला मजूर न मिळाल्याने सध्या अनेक कामे लांबणीवर पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.