शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा, शेतकऱ्यांची जलसिंचनाची समस्या सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 17:34 IST

शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार

संतोष धुमाळपिंपोडे बुद्रूक : गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सातारा सिंचन मंडळाच्या आधिपत्याखालील सहा मोठ्या व सहा मध्यम धरण प्रकल्पांमध्ये जानेवारीच्या प्रारंभी समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे.सद्य:स्थितीत धरणांमध्ये ८४.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जलसिंचनाच्या व वीजनिर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या कोयना धरणामध्ये ८३.३१ टक्के तर धोम धरणांमध्येदेखील ८३.३१ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा बघता जिल्हावासींची पुढील जूनपर्यंत तहान भागविताना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळणार आहे.जिल्ह्यात गतवर्षी ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत माॅन्सूनने मुक्काम ठोकला. अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या दीड पट पर्जन्याची नोंद झाली. काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. अखेरच्या टप्प्यातील पावसाने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. जिल्ह्यात आजमितीस १२२.४२ अब्ज घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये याच काळात १२३.८२ अब्ज घनफूट (८५.२३ टक्के) पाणी होते. तर सातारा सिंचन मंडळात असलेल्या व जलसिंचनाचे बहुतांशी क्षेत्र पुणे जिल्ह्यात असलेल्या निरा-देवघर, भाटघर, वीर धरणांमध्ये ३८.९० अब्ज घनफूट पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या येरळवाडी, मोरणा, उत्तरामांड, नागेवाडी, महू, हतगेघर या सहा धरणांमध्ये १२२.४२ अब्ज घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी ८४.२६ टक्के एवढी आहे. सद्य:स्थितीतील धरणांचा समाधानकारक पाणीसाठा विचारात घेता यावर्षी जलसिंचनाची समस्या भेडसावण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बागायती पिकांचे नियोजन करता येणार आहे. अर्थात, त्यासाठी जलसंपदा विभाग व शेतकरी यांनीदेखील पाणीवाटपाचे व पाणीवापराचे काटकसरीचे नियोजन करावयास हवे.

आजअखेरीस जिल्ह्यांतील धरणांमधील समाधानकारक पाणीसाठा असला, तरी पाण्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर झाला पाहिजे. नदीच्या विशेषत: पाण्याच्या प्रदूषणाबाबत शासन राबवीत असलेल्या ‘चला, जाणूया नदीला’ या अभियानाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. भविष्यकाळात आपण याबाबत अधिक सजग राहण्याची गरज आहे. -संजय डोईफोडे, अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन विभाग. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीDamधरणFarmerशेतकरी