शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

वाहनांचा वेग ठरतोय वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST

पेट्री : सातारा-कास-बामणोली मार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. काही भाग वगळता या मार्गावर रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाल्याने ...

पेट्री : सातारा-कास-बामणोली मार्गावर वन्यजीवांचा अधिवास आहे. काही भाग वगळता या मार्गावर रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाल्याने वाहने सुसाट धावत आहेत. मात्र, वाहनांचा हा वेग वन्यजीवांसाठी कर्दनकाळ ठरू लागला आहे. भरधाव वाहनांच्या धडकेत वन्यप्राण्यांचे मृत्यू होत आहेत तर अनेक सरपटणाऱ्या जिवांनाही प्राण गमवावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेगावर कुठेतरी मर्यादा ठेवणे गरजेचे बनले आहे.

कास मार्गावरील यवतेश्वर घाटात वानरांची ये-जा सुरू असते. घाटातून साताऱ्याकडे तीव्र उतारावर काहीजण वाहनांना आऊटऑफ मारतात. त्यामुळे एखादा वन्यजीव समोर आल्यास वाहनावर नियंत्रण ठेवणे अवघड होते. कास-बामणोली मार्गावरही अनेकदा वन्यजीव मुख्य रस्ता ओलांडताना पहावयास मिळतात. पावसाची रिपरिप, दाट धुके, घाटरस्ता, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाच्या मार्गामुळे रात्री तसेच दिवसादेखील अंदाज न आल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

अनेक वन्यजीव अन्न, पाण्याच्या शोधार्थ इकडून तिकडे भ्रमंती करतात. स्टंट, हुल्लडबाजी करून वाहन चालवणाऱ्यांकडून या मार्गावरील वन्यजीवांना धोका उद्भवत आहे. साप, सरडा, बेडूक असे कित्येक प्राणी वाहनांच्या चाकाखाली चिरडून ठार होत आहेत. हा प्रकार कुठेतरी थांबायला हवा. वाहनधारकांनी यासाठी वाहनांच्या वेगावर मर्यादा ठेवणे गरजेचे आहे.

(कोट)

सातारा-कास-बामणोली या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही तरुण या मार्गावर स्टंट करतात. वेगाने गाडी चालविणाऱ्यांची देखील कमी नाही. त्यामुळे अनेक सरपटणारे जीव चाकाखाली चिरडत आहेत. मुक्या प्राण्यांचे रक्षण करणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. वाहनधारकांनीदेखील ही जबाबदारी ओळखावी.

- प्रदीप शिंदे, कासपठार कार्यकारी समिती, कर्मचारी

(चौकट)

सातारा-बामणोली मार्गावर नेहमीच वन्यजीवांचा मुक्तसंचार असतो. भेकर, रानडुक्कर, रानगवे, ससे, रानकोंबड्या, साळींदर, मोर, घोरपड, अन्य सरपटणारे प्राणी निर्भीडपणे रस्त्याच्या एकाबाजूकडून दुसऱ्या बाजूकडे संचार करत असतात. हे वन्यप्राणी सह्याद्रीचे वैशिष्ट्य आहेत. पशूपक्षी व त्यांचा अधिवास सुरक्षित रहावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा पर्यावरणपेमींमधून व्यक्त होत आहे.

फोटो : २३ सागर चव्हाण

सातारा-कास मार्गावर गणेशखिंड परिसरात वाहनाखाली घोणस जातीचा सर्प चिरडला गेला. (छाया : सागर चव्हाण)