शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

उरूलच्या वनक्षेत्रात जाळरेषा काढण्यास वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST

पाटण वनविभाग : वणवा रोखण्यासाठी केली उपाययोजना मल्हारपेठ : पाटण वनविभागामार्फत डोंगरात वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये, यासाठी ...

पाटण वनविभाग : वणवा रोखण्यासाठी केली उपाययोजना

मल्हारपेठ : पाटण वनविभागामार्फत डोंगरात वणवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये, यासाठी वनक्षेत्रात जाळरेषा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

डोंगरातील गवत जाळल्यामुळे चांगले गवत उगवते, असा समज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा असतो. मात्र, हा चुकीचा समज असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. कारण जेव्हा गवत जळते तेव्हा त्याच्यात नवीन तयार होणारे बीदेखील नष्ट होत असते आणि बुडाशी असणारी मुळे नष्ट होऊन त्याठिकाणचे गवत नाहीसे होते, असे मल्हारपेठ वनविभागाचे वनक्षेत्रपाल भाट यांनी सांगितले. शासन शतकोटी वृक्षलागवड करताना दिसत आहे. मात्र, या झाडांचे संगोपन होताना दिसत नाही. केवळ वन विभागाने वृक्ष संवर्धनासाठी न झटता समाजातील सर्व घटकांनी आपली जबाबदारी समजून त्याचे रक्षण केले पाहिजे असे, मतही यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

दरवर्षी वन विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात जाळपट्टा काढला जातो. मात्र, यावर्षी पूर्ण हंगामच उशिरा सुरू झाल्याने गवत हिरवे राहिले. सर्वच विभागांत सध्या वन क्षेत्रातील जाळपट्टा काढला आहे. तरीही शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. वणवा लावल्यास कारवाई होणार आहे. शेतकऱ्यांनी शेतातील कचरा पेटवताना काळजी घ्यावी. वनाचे संरक्षण करावे, असे आवाहन वन क्षेत्रपाल भाट यांनी केले आहे.