शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड आरक्षण सोडतीने ‘कही खुशी, कही गम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वत: ही आरक्षण सोडत जाहीर केली. यावेळी शहर पोलीस निरीक्षक बी. ...

यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृहात तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी स्वत: ही आरक्षण सोडत जाहीर केली. यावेळी शहर पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

सकाळी ११.३० वाजता सोडतीला प्रारंभ झाला. अनुसूचित जाती महिलांच्यासाठी तेरा गावांच्या चिठ्ठ्या शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढून आरक्षण सोडतीला सुरुवात झाली. त्यानंतर बारा ठिकाणी याच प्रवर्गातील पुरुषांसाठी सोडत काढण्यात आली, तर अनुसूचित जमातीसाठी एका गावात आरक्षण देण्यात आले. त्यापाठोपाठ इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करायला सुरुवात झाली. सन १९९५ पासून ज्या गावांना एकदाही या प्रवर्गाचे आरक्षण पडलेले नाही. त्या गावांना आरक्षण देण्यात आले. त्यानंतर सन २००० सालचे आरक्षण विचारात घेऊन पुढील आरक्षण जाहीर करण्यात आले, तर या प्रवगार्साठी पाच गावांचे आरक्षण चिठ्ठ्या टाकून निश्चित करण्यात आले. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षणे स्त्री किंवा पुरुष निश्चित केले. तालुक्यातील १२० गावांत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडले. त्यातील साठ गावे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आली, तर ५४ गावांना नागरिकांचाच मागास प्रवर्गासाठी लॉटरी लागली. त्यात २७ गावांत महिला कारभार पाहणार आहेत.

नुकत्याच निवडणूका झालेल्या गावातील सदस्य ‘मीच सरपंच होणार’ अशी अटकळ बांधून आले होते, पण आरक्षण जाहीर होताच ‘कही खुशी, कही गम’ परिस्थिती दिसली. मतदान झाल्यानंतर महिन्याच्या आत सरपंच-उपसरपंच निवडप्रक्रिया पूर्ण करायची असते. त्यामुळे येत्या १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल. तोवर अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत हे मात्र नक्की !

- चौकट

अनेकांची धाकधूक वाढली

तालुक्यातील अनेक गावांत काही पॅनलने काठावरचे बहुमत मिळवले आहे. त्या गावात आपले नवनिर्वाचित सदस्य आपल्या पॅनलसोबत कायम ठेवणे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे.