शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:15 IST

हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले.

ठळक मुद्देकिल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला ३० नोव्हेंबरला ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत.

महाबळेश्वर : स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वध केला. याच किल्ल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले. त्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण होत आहे.महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला. तो म्हणजे प्रतापगड. हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा राजवाडा ब्रिटिशांनी १८१८ ला उद्ध्वस्त केला. शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामथ यांनी प्रतापगडावर बसविण्यात आलेला पुतळा विलेपार्ले येथे बनविला.

हा पुतळा पंचधातूंचा बनविण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन ४ हजार ५०० किलो म्हणजे ४.५ टन आहे; परंतु हा पुतळा आतून भरीव नसून पोकळ आहे. हा पुतळा एवढा जड असल्यामुळे भाग सुटे करून एकूण सतरा भाग गडावर आणण्यात आले. याला तेथे वेल्डिंगच्या साह्याने जोडण्यात आला, त्यानंतर लाकडी क्रेन करून चौथऱ्यावर ठेवण्यात आला.

यामध्ये घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो, याचा अर्थ असा होतो की, घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झाला आहे. तर काही घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असतात. त्यावर बसलेला राजा लढाईत मारला गेलेला असतो. चारही पाय घोड्याचे जमिनीवर असल्यास तो राजा समोरच्या राजाला शरण गेलेला असतो. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला ३० नोव्हेंबरला ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत.पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान पंडित नेहरू पुतळ्याच्या मागील बाजूला गेले होते. तेथे काही क्षण बसले होते. तेथे नेहरू पॉर्इंट असे नाव देण्यात आले होते.पुतळ्याची उंची ३६ फूटघोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत एकूण १६ फूट उंच आहे. चौथºयापासून ३६ फूट आहे. चौथरा २० फुटांचा आहे. १९ फेब्रुवारी १६३० ते ०३ एप्रिल १६८० असे छत्रपती शिवाजी महाराज वयाचे पन्नास वर्षे जगले. यामध्ये महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यामधील तोरणा किल्ला जिंकला. पंधरा वर्षांपासून पन्नास वयापर्यंत राज्य केले. ३६५ किल्ल्यांपैकी ३६ किल्ले महाराजांनी बांधले. ३६ वर्षांत ३६ किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची ३६ फूट ठेवण्यात आली.ब्रिटिशांकडून दोन पत्रप्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासंदर्भात ब्रिटिशांच्या ग्रंथालयामध्ये दोन पत्र मिळाली आहेत. यामध्ये पहिल्या पत्रात ह्यछत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व मोठं आहे, याची तुलना अलेक्झांडर यांच्याशीही होत नाही,ह्ण असा उल्लेख आहे. दुसरे पत्र शिवाजी महाराजांनी मोघल अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ह्यमाझ्या मायभूमीचं रक्षण करणं, माझं कर्तव्य होय, या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो, तो कधीच यशस्वी झाला नाही,ह्ण असा उल्लेख केला आहे. या दोन्ही पत्रांच्या प्रती पुतळा परिसरात लावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFordफोर्ड