शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

प्रतापगडावरील शिवरायांच्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 11:15 IST

हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले.

ठळक मुद्देकिल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला ३० नोव्हेंबरला ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत.

महाबळेश्वर : स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी वध केला. याच किल्ल्यावर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ३० नोव्हेंबर १९५७ रोजी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले. त्या पुतळ्याला ६२ वर्षे पूर्ण होत आहे.महाबळेश्वरच्या जटांत व पारघाटाच्या ओठात शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला. तो म्हणजे प्रतापगड. हा किल्ला आजही सुस्थितीत उभा असून, किल्ल्यावर ३० नोव्हेंबर १९५७ रोजी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी किल्ले प्रतापगड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा राजवाडा ब्रिटिशांनी १८१८ ला उद्ध्वस्त केला. शिल्पकार रामचंद्र पांडुरंग कामथ यांनी प्रतापगडावर बसविण्यात आलेला पुतळा विलेपार्ले येथे बनविला.

हा पुतळा पंचधातूंचा बनविण्यात आला आहे. या पुतळ्याचे वजन ४ हजार ५०० किलो म्हणजे ४.५ टन आहे; परंतु हा पुतळा आतून भरीव नसून पोकळ आहे. हा पुतळा एवढा जड असल्यामुळे भाग सुटे करून एकूण सतरा भाग गडावर आणण्यात आले. याला तेथे वेल्डिंगच्या साह्याने जोडण्यात आला, त्यानंतर लाकडी क्रेन करून चौथऱ्यावर ठेवण्यात आला.

यामध्ये घोडीचा एक पाय हवेत असलेला दिसतो, याचा अर्थ असा होतो की, घोडीवर बसलेल्या राजाचा मृत्यू नैसर्गिक आजारपणामुळे झाला आहे. तर काही घोड्याचे पुढचे दोन्ही पाय हवेत असतात. त्यावर बसलेला राजा लढाईत मारला गेलेला असतो. चारही पाय घोड्याचे जमिनीवर असल्यास तो राजा समोरच्या राजाला शरण गेलेला असतो. किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला ३० नोव्हेंबरला ६२ वर्षे पूर्ण झाले आहेत.पुतळा अनावरण कार्यक्रमामध्ये पंतप्रधान पंडित नेहरू पुतळ्याच्या मागील बाजूला गेले होते. तेथे काही क्षण बसले होते. तेथे नेहरू पॉर्इंट असे नाव देण्यात आले होते.पुतळ्याची उंची ३६ फूटघोड्याच्या पायापासून ते तलवारीच्या टोकापर्यंत एकूण १६ फूट उंच आहे. चौथºयापासून ३६ फूट आहे. चौथरा २० फुटांचा आहे. १९ फेब्रुवारी १६३० ते ०३ एप्रिल १६८० असे छत्रपती शिवाजी महाराज वयाचे पन्नास वर्षे जगले. यामध्ये महाराजांनी वयाच्या पंधराव्या वर्षी पुण्यामधील तोरणा किल्ला जिंकला. पंधरा वर्षांपासून पन्नास वयापर्यंत राज्य केले. ३६५ किल्ल्यांपैकी ३६ किल्ले महाराजांनी बांधले. ३६ वर्षांत ३६ किल्ले बांधले म्हणून पुतळ्याची उंची ३६ फूट ठेवण्यात आली.ब्रिटिशांकडून दोन पत्रप्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्यासंदर्भात ब्रिटिशांच्या ग्रंथालयामध्ये दोन पत्र मिळाली आहेत. यामध्ये पहिल्या पत्रात ह्यछत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कर्तृत्व मोठं आहे, याची तुलना अलेक्झांडर यांच्याशीही होत नाही,ह्ण असा उल्लेख आहे. दुसरे पत्र शिवाजी महाराजांनी मोघल अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ह्यमाझ्या मायभूमीचं रक्षण करणं, माझं कर्तव्य होय, या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो, तो कधीच यशस्वी झाला नाही,ह्ण असा उल्लेख केला आहे. या दोन्ही पत्रांच्या प्रती पुतळा परिसरात लावण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFordफोर्ड