शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

By प्रमोद सुकरे | Updated: June 3, 2025 13:04 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू

प्रमोद सुकरे कऱ्हाड: विधानसभा जिंकली पण आता मिनी विधानसभा जिंकण्यासाठी राजकीय पक्षांची जुळवाजुळव सुरू आहे. कऱ्हाड तालुक्यात तर भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनी त्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र विरोधी महाविकास आघाडीच्या गोटात मात्र शांतता दिसत आहे.

कऱ्हाड तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र गत विधानसभा निवडणुकीत डॉ. अतुल भोसले यांनी येथे परिवर्तनाचे 'कमळ' फुलवले आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात निश्चितच चांगले वातावरण आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू आहे. म्हणून तर काँग्रेसच्या गोटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांना भाजपने गळ टाकला असून अनेक जण या गळालाही लागले आहेत. त्यांचे पक्षप्रवेश गेल्या दोन महिन्यात वेळोवेळी झाले आहेत.

तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने एकच मोठा डाव मारला . काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड.उदयसिंह पाटील यांनाच पक्षप्रवेश देत तालुक्यातील राजकारणात मोठा भूकंप घडवला.

एकनाथ शिंदे शिवसेना गटाने देखील कराड शहर व तालुक्याला मोठा विकास निधी दिला असून त्यांचे शिलेदारही कामाला लागले आहेत. नुकताच पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थित कराडला एक मेळावा झाला. त्या मेळाव्यातही अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

सत्तेत असणाऱ्या महायुतीतील तिन्ही पक्ष आपली पक्ष संघटना वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. या उलट महाविकास आघाडीतील घटक पक्ष मात्र शांत दिसत आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणतात ..

भाजपने ईडी, सीबीआय ची भीती दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना गळाला लावले. भाजप वाढवण्यासाठी त्यांना काँग्रेसचीच मदत घ्यावी लागते आहे. त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच क्लीन चीट देत पक्षात घेतले आहे. काँग्रेसमुक्त भारत करता करता त्यांची भाजप काँग्रेस युक्त झाली आहे. पण अशाने काँग्रेस कधीही संपणार नाही. असा हल्लाबोल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या एका काँग्रेसच्या मेळाव्यात केला.

अतुल भोसले म्हणतात..त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात थांबायला तयार नाहीत. काँग्रेसमध्ये आपल्याला भविष्य नाही हे त्यांना पटू लागल्यामुळेच ते भाजपमध्ये दाखल होत आहेत. मात्र ३९ हजार मतांनी झालेला पराभव आणि त्यानंतर काँग्रेस पक्षात सुरू असणारी गळती यामुळे अस्वस्थ होऊन पृथ्वीराज चव्हाण वक्तव्य करीत आहेत. तुम्ही जेव्हा ईव्हीएम मशीनद्वारे निवडून आला तेव्हा ते बरोबर होते आणि पराभव झाल्यावर मात्र तुम्ही कोर्टात जाता ही गोष्ट न पटणारी आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी आता पराभव पचवायची सवय करावी.अशी उपरोधिक टीका भाजपचे आमदार व जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी एका कार्यक्रमात माध्यमांशी बोलताना  केली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अँड. उदयसिंह पाटील यांचा पक्षप्रवेश करीत धमाका केला. पण उदयसिंह पाटलांच्या घड्याळाला अजून पूर्ण चावी मिळाल्याचे दिसत नाही‌. कारण एड. उदयसिंह पाटील यांनी पक्षप्रवेशानंतर ज्या पद्धतीने मतदार संघात काम करणे त्यांच्याच कार्यकर्त्यांना अपेक्षित होते तसे काम होत नसल्याची खंत त्यांचेच कार्यकर्ते खासगीत व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडPoliticsराजकारणMahayutiमहायुतीBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना