शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

शिरवळ-लोणंद चौपदरीकरण; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 5:03 PM

highway, road transport, pwd, Satara area, Makrand Patil शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील रखडलेल्या प्रश्नाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढूपणा करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायला वेळ लावता, त्याचा मोबदला तुम्हाला खिशातून द्यावा लागणार आहे काय? भूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावावा,ह्ण अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देशिरवळ-लोणंद चौपदरीकरण; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टीभूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावा : मकरंद पाटील

खंडाळा : शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील रखडलेल्या प्रश्नाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढूपणा करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायला वेळ लावता, त्याचा मोबदला तुम्हाला खिशातून द्यावा लागणार आहे काय? भूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावावा,ह्ण अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.खंडाळा तहसील कार्यालयात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यांची शेतकऱ्यांसमवेत आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, प्रांताधिकारी संगीता चौगुले, सभापती राजेंद्र तांबे, तहलीदार दशरथ काळे, बांधकामचे उपअभियंता विश्वास ओहाळ, बाळासाहेब साळुंखे तसेच इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत महिनाभरात संपादित जमिनींचा तडजोडीचा प्रस्ताव तयार करणे, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीनीचे कजापचे आदेश झाले आहेत. त्यातील बागायत व पोट खराब क्षेत्रात झालेल्या त्रुटी दूर करणे, संपादित जमिनीतील झाडे, विहिरी, ताली, फळझाडे यांचे मूल्यांकन करुन निवाड्यात समावेश करावा. ज्या इमारती, घरे, दुकाने रस्त्यात बाधित होत आहेत अशा इमारतींचे संपूर्ण मूल्यांकन व्हावे याबाबत चर्चा करण्यात आली.वास्तविक या मार्गावर संपादित होणाऱ्या ज्या जमिनीचा निवाड्यात समावेश झाला नाही त्यांची नावे समाविष्ट करण्याबाबत तसेच भूसंपादित जमिनीचे व इतर मालमत्तेचे होणाऱ्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन व्हावे यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने वारंवार लढा दिला. परंतु यावर मार्ग निघत नसल्याने आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दहा वर्षे शेतकऱ्यांची झालेली फरफट थांबण्याची चिन्हे आहेत.जमणार नसेल तर तसं सांगाजमिनीचा योग्य मोबदला दिल्यास शेतकरी संपादनाला संमती देण्यास तयार आहेत. ज्या लोकांचे क्षेत्र रस्त्यासाठी जाऊनही त्यांची निवाड्यात नोंद नाही त्यांचे तडजोडीचे प्रस्ताव पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने देऊन संपादन प्रक्रिया पूर्ण करावी असे ठरले असताना बांधकाम विभागाने टाळाटाळ केली. यामुळे नऊ महिन्यांत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. होणार नसेल तर तसं सांगा. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी बोलावून घेतो. आता एक महिन्यात प्रश्न मिटवला नाही तर तुमची तक्रार मंत्री पातळीवर करावी लागेल,ह्ण असे शब्दात आमदार मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटील