शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

शिरवळ-लोणंद चौपदरीकरण; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:05 IST

highway, road transport, pwd, Satara area, Makrand Patil शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील रखडलेल्या प्रश्नाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढूपणा करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायला वेळ लावता, त्याचा मोबदला तुम्हाला खिशातून द्यावा लागणार आहे काय? भूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावावा,ह्ण अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.

ठळक मुद्देशिरवळ-लोणंद चौपदरीकरण; बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टीभूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावा : मकरंद पाटील

खंडाळा : शिरवळ-लोणंद चौपदरीकरणाच्या भूसंपादनातील रखडलेल्या प्रश्नाबाबत वारंवार सूचना करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग वेळकाढूपणा करीत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवायला वेळ लावता, त्याचा मोबदला तुम्हाला खिशातून द्यावा लागणार आहे काय? भूसंपादनाचा प्रश्न महिना अखेरपर्यंत मार्गी लावावा,ह्ण अशा सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केल्या.

खंडाळा तहसील कार्यालयात महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रमुख अधिकारी यांची शेतकऱ्यांसमवेत आयोजीत बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, प्रांताधिकारी संगीता चौगुले, सभापती राजेंद्र तांबे, तहलीदार दशरथ काळे, बांधकामचे उपअभियंता विश्वास ओहाळ, बाळासाहेब साळुंखे तसेच इतर प्रमुख अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत महिनाभरात संपादित जमिनींचा तडजोडीचा प्रस्ताव तयार करणे, शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीनीचे कजापचे आदेश झाले आहेत. त्यातील बागायत व पोट खराब क्षेत्रात झालेल्या त्रुटी दूर करणे, संपादित जमिनीतील झाडे, विहिरी, ताली, फळझाडे यांचे मूल्यांकन करुन निवाड्यात समावेश करावा. ज्या इमारती, घरे, दुकाने रस्त्यात बाधित होत आहेत अशा इमारतींचे संपूर्ण मूल्यांकन व्हावे याबाबत चर्चा करण्यात आली.

वास्तविक या मार्गावर संपादित होणाऱ्या ज्या जमिनीचा निवाड्यात समावेश झाला नाही त्यांची नावे समाविष्ट करण्याबाबत तसेच भूसंपादित जमिनीचे व इतर मालमत्तेचे होणाऱ्या नुकसानीचे योग्य मूल्यांकन व्हावे यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीने वारंवार लढा दिला. परंतु यावर मार्ग निघत नसल्याने आमदार मकरंद पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे दहा वर्षे शेतकऱ्यांची झालेली फरफट थांबण्याची चिन्हे आहेत.

जमणार नसेल तर तसं सांगा

जमिनीचा योग्य मोबदला दिल्यास शेतकरी संपादनाला संमती देण्यास तयार आहेत. ज्या लोकांचे क्षेत्र रस्त्यासाठी जाऊनही त्यांची निवाड्यात नोंद नाही त्यांचे तडजोडीचे प्रस्ताव पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाने देऊन संपादन प्रक्रिया पूर्ण करावी असे ठरले असताना बांधकाम विभागाने टाळाटाळ केली. यामुळे नऊ महिन्यांत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही. होणार नसेल तर तसं सांगा. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी बोलावून घेतो. आता एक महिन्यात प्रश्न मिटवला नाही तर तुमची तक्रार मंत्री पातळीवर करावी लागेल,ह्ण असे शब्दात आमदार मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गroad transportरस्ते वाहतूकpwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसरMakrand Patilमकरंद पाटील